शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

शेततळ्यांचा पशूंना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:41 PM

रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते.

ठळक मुद्देउन्हाचा तडाखा : तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निर्माण करण्यात आलेले शेततळे व वनतलाव पाळीव व रानटी जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदून दिले जाते. या शेततळ्यांचा उपयोग शेतकरी पावसाळ्यात अंतिम टप्प्यात पीक असताना विशेषत: करतात. कारण या कालावधीत पावसाने दगा दिला असतो. पिकाच्या अंतिम टप्प्यात हे तलाव उपयुक्त ठरतात. याशिवाय उन्हाळ्यात पाळीव जनावरांसाठी या शेततळ्यांचा उपयोग होतो. याशिवाय जलयुक्त शिवार योजनेतून जंगलालगत अथवा गावाच्या बाहेर निर्माण करण्यात आलेल्या वनतलावातील पाणी जनावरांसाठी उपयोगी ठरतो. अशा प्रकारचे अनेक शेततळे व वनतलाव सध्या उपयुक्त ठरत आहेत. गावागावांतील अनेक विहिरी व हातपंपाने तळ गाठला असताना जिल्ह्यातील अनेक शेततळे व वनतलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक असल्याने जनावरांचा त्याचा उपयोग होत आहे.पंधरवड्यात पडणार कोरडेउन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विहिरी व हातपंप कोरडे पडत आहेत. अशा स्थितीतही शेततळे व वनतलावातील थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु हा पाणीसाठा जास्तीत जास्त पंधरा दिवसांपर्यंत राहू शकतो. पंधरवड्यानंतर वनतलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणी