शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनामार्फत पीक विमा याेजना राबविली जाते. खरीप हंगामात जिल्हाभरातील ३४ हजार ८३२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या  पुरामुळे माेठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाहून गेले. तरीही अनेक शेतकऱ्यांना अजुनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. ती अत्यंत कमी आहे.

ठळक मुद्देरबीतील स्थिती : एकाही शेतकऱ्याने विमा काढला नाही

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्हाभरात १८ हजार ४५६ हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र यापैकी एकाही शेतकऱ्याने पीक विमा काढला नाही. विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने अनेक शेतकरी विमा काढण्याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येते आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनामार्फत पीक विमा याेजना राबविली जाते. खरीप हंगामात जिल्हाभरातील ३४ हजार ८३२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या  पुरामुळे माेठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाहून गेले. तरीही अनेक शेतकऱ्यांना अजुनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. ती अत्यंत कमी आहे. असा अनुभव दरवर्षी येत असल्याने रबी हंगामातील पिकांचा शेतकरी विमा काढत नाही. रबी पिकांचा विमा काढण्याची १५ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. तरीही अजुनपर्यंत एकाही शेतकऱ्याने पीक विमा काढला नाही. पुढील आठ दिवसात विमा काढतील, अशी शक्यतासुद्धा नाही.  

खरिपातील नुकसान भरपाईची प्रतीक्षावैनगंगा नदीला यावर्षी महापूर आला. यात हजाराे हेक्टरवरील जमिनीवर धान पीक नष्ट झाले. या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अत्यंत तुटपुंजी रक्कम देण्यात आली. तर गडचिराेली तालुक्यातील शेतकऱ्यांना अजुनपर्यंत विम्याची रक्कम मिळाली नाही. नुकसान भरपाई देतेवेळी अनेक अटी व शर्ती लावल्या जातात. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान हाेते. त्यामुळेच शेतकरी विमा काढण्याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांची फसवणूकमागील अनेक वर्षांपासून मी विमा काढत आहे. मात्र एकदाही विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे विमा काढून काहीच फायदा नाही. हीच बाब माझ्या गावातील अनेक शेतकऱ्यांसाेबत घडली आहे. विमा कंपनीचे पाेट भरण्यासाठी शासन शेतकऱ्यांची लूट करीत आहे. शासनाने याेजनेत बदल करावा. - माराेती मंगर, शेतकरी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी