शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनामार्फत पीक विमा याेजना राबविली जाते. खरीप हंगामात जिल्हाभरातील ३४ हजार ८३२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या  पुरामुळे माेठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाहून गेले. तरीही अनेक शेतकऱ्यांना अजुनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. ती अत्यंत कमी आहे.

ठळक मुद्देरबीतील स्थिती : एकाही शेतकऱ्याने विमा काढला नाही

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्हाभरात १८ हजार ४५६ हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र यापैकी एकाही शेतकऱ्याने पीक विमा काढला नाही. विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने अनेक शेतकरी विमा काढण्याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येते आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनामार्फत पीक विमा याेजना राबविली जाते. खरीप हंगामात जिल्हाभरातील ३४ हजार ८३२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या  पुरामुळे माेठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाहून गेले. तरीही अनेक शेतकऱ्यांना अजुनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. ती अत्यंत कमी आहे. असा अनुभव दरवर्षी येत असल्याने रबी हंगामातील पिकांचा शेतकरी विमा काढत नाही. रबी पिकांचा विमा काढण्याची १५ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. तरीही अजुनपर्यंत एकाही शेतकऱ्याने पीक विमा काढला नाही. पुढील आठ दिवसात विमा काढतील, अशी शक्यतासुद्धा नाही.  

खरिपातील नुकसान भरपाईची प्रतीक्षावैनगंगा नदीला यावर्षी महापूर आला. यात हजाराे हेक्टरवरील जमिनीवर धान पीक नष्ट झाले. या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अत्यंत तुटपुंजी रक्कम देण्यात आली. तर गडचिराेली तालुक्यातील शेतकऱ्यांना अजुनपर्यंत विम्याची रक्कम मिळाली नाही. नुकसान भरपाई देतेवेळी अनेक अटी व शर्ती लावल्या जातात. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान हाेते. त्यामुळेच शेतकरी विमा काढण्याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांची फसवणूकमागील अनेक वर्षांपासून मी विमा काढत आहे. मात्र एकदाही विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे विमा काढून काहीच फायदा नाही. हीच बाब माझ्या गावातील अनेक शेतकऱ्यांसाेबत घडली आहे. विमा कंपनीचे पाेट भरण्यासाठी शासन शेतकऱ्यांची लूट करीत आहे. शासनाने याेजनेत बदल करावा. - माराेती मंगर, शेतकरी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी