शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

शेतकरी नवरा नकाे गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

डाॅक्टर, इंजिनिअर, हायप्राेफाईल जावई पाहिजे, अशी अपेक्षा वधुपिता व्यक्त करतात. याशिवाय मुलगा, खेड्यात राहणारा नसावा, ताे शहरात वास्तव्याला असेल तरच मुलगी दाखविण्यासाठी मंडळी तयार असतात. अनेकदा तर मुलगा शेती व्यवसाय करताे, असे म्हणून बऱ्याचदा मुलीही दाखविल्या जात नाही. समाजातील शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकाेन आजही अतिशय वाईट आहे.

ठळक मुद्देवराकडील मंडळी हैराण : पगारी नाेकरदारालाच मुलींची अधिक पसंती

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : उत्तम नाेकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, अशी संपूर्ण समाजरचना सध्या तयार झाली आहे. त्यामुळे मुलीचे लग्न जुळविताना नाेकरी असलेला मुलगा प्राधान्याने शाेधला जाताे तर शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठीसुद्धा वधू-पिता तयार हाेत नाही. त्यातून शेतकरी कुटुंबांची अवस्था फार वाईट झाली आहे. एकूणच शेतकरी नवरा नकाे बाई, असा सूर वधू कुटुंबीयांकडून काढला जात आहे. डाॅक्टर, इंजिनिअर, हायप्राेफाईल जावई पाहिजे, अशी अपेक्षा वधुपिता व्यक्त करतात. याशिवाय मुलगा, खेड्यात राहणारा नसावा, ताे शहरात वास्तव्याला असेल तरच मुलगी दाखविण्यासाठी मंडळी तयार असतात. अनेकदा तर मुलगा शेती व्यवसाय करताे, असे म्हणून बऱ्याचदा मुलीही दाखविल्या जात नाही. समाजातील शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकाेन आजही अतिशय वाईट आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मुलांचे लग्नकार्य जुळविण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहे. तालुका, जिल्हा स्थळासाेबतच माेठ्या शहरांमध्ये मुली देण्यासाठी वधूपिता उत्सुुक असतात. व्यापारी अथवा मुलगा कुठलाही व्यवसाय करत असेल तर सामान्य घरातील मुलगी त्याला दिली जाते.

अटी मान्य असतील तर बाेला...सद्य:स्थितीत लग्न ही एक जाेखमेची बाब म्हणून शेतकरी कुटुंबाला वाटत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कुटुंबांमध्ये मुली देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात असणारा मुलगा हवा. ताे एकटाच असावा. त्याला बहीण-भाऊ नसावे, अशा अटी बरेच कुटुंबीय टाकत असतात. मुलांकडूनही सुंदर दिसणारी मुलगी निवडली जात आहे. अपेक्षा पूर्ण हाेत असेल तरच लग्न जुळून येत आहेत.

सर्वाधिक मागणी डाॅक्टरांना सर्वाधिक मागणी डाॅक्टर व अभियंत्यांना आहे. असे स्थळ असेल, तरच आमची मुलगी दाखवू असे वधूपित्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मुली शाेधताना अडचणी येत आहेत.  सद्य:स्थितीत वधूपित्याचे भाव वधारले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील, गरीब घरातील मुलगी असली तरी वधूपिता जे वाक्य बाेलेल ते वरपित्याला मान्य करावे लागेल. अन्यथा लग्न जुळणे कठीण आहे.  शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी देण्यासाठी वधूपिता तयार नाही. शेतकऱ्यांकडे व त्यांच्या कुटुंबाकडे पैसा राहत नाही. शेती निसर्गावर अवलंबून आहे. यामुळे वधूपिता शेतकरी कुटुंबाला मुलगी द्यायला तयार नाही.

शेती व्यवसाय हा चांगला असला तरी त्यात धाेके अनेक आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात बऱ्याचदा नुकसान हाेत असते. माझ्याकडे सात एकरापेक्षा अधिक शेती आहे. मात्र, मुलाचे लग्न जुळविण्यासाठी याेग्य मुलगी मिळत नसल्याचे समस्या आहे. - पांडुरंग लटारे, वरपिता

पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान हाेते. मुलगा काय करताे, याला महत्त्व नव्हते तर शेती किती आहे, कुटुंबीय कसे आहेत, त्याची प्रतिष्ठा कशी आहे. या बाबीला महत्त्व दिले जात हाेते. मात्र, आता बदल झाला आहे. मुलगा शेती करताे, असे सांगितले की, प्रतिसाद मिळत नाही.- नीळकंठ तिवाडे, वरपिता

लग्नकार्यात मुलीच्या विराेधात जाता येत नाही, पूर्वी आई-वडील, कुटुंबातील लाेकांनी पसंत केलेला मुलगा, स्थळ नाकारले जात नव्हते. मात्र, आता काळानुरूप बदल झाला आहे. आता मुलीच्या मनाला प्राधान्य आहे. शेवटी तिचे आयुष्य सुखी जावाे, अशीच आई-वडिलांची इच्छा असते. - लक्ष्मण गाेटा, वधूपिता

मुलगी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मुलगा नाेकरी असलेला मिळेल तर आम्ही नक्कीच लग्नासाठी तयार हाेऊ. नाेकरी किंवा व्यवसाय करणारा मुलगा असावा, अशी मुलीची इच्छा आहे. -भक्तदास चुधरी,वधूपिता

 

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्न