शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कुटुंबं गाढ झोपेत अन् तीन घरांना आगीचा वेढा; सुदैवाने जीवितहानी टळली, संसार उघड्यावर

By संजय तिपाले | Updated: March 3, 2024 14:28 IST

पहाटे साखरझोपेत असतानाच तीन घरांना आगीने कवेत घेतले. शेजाऱ्यांनी आरडाओरड करुन कुटुंबांना जागे केले अन् ते सुखरुप बाहेर आली, त्यानंतर काही क्षणातच तिन्ही घरे जळून खाक झाली.

गडचिरोली: पहाटे साखरझोपेत असतानाच तीन घरांना आगीने कवेत घेतले. शेजाऱ्यांनी आरडाओरड करुन कुटुंबांना जागे केले अन् ते सुखरुप बाहेर आली, त्यानंतर काही क्षणातच तिन्ही घरे जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली, पण या घटनेेने कुटुंबे उघड्यावर आली. ही घटना ३ मार्चला पहाटे अहेरी तालुक्यातील देवलमारीत घडली. आगीमागील कारण अस्पष्ट आहे.

अहेरीपासून १२ किलोमीटर अंतरावरील देवलमारी येथील मुत्तय्या मंचर्ला हे शेखर व संतोष या दोन मुलांसह राहतात. तिघांचीही स्वतंत्र घरे आहेत. २ मार्चला रात्री जेवण करुन सर्वजण आपापल्या घरी झोपी गेेले. पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरांना आग लागली. आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी तिघांनाही जागे केले. त्यानंतर ते कुटुंबासह घराबाहेर पडले. या आगीत धान्य, कपडे, भांडी व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आग एवढी भीषण होती की ती आटोक्यात आणण्याची संधीही मंचर्ला कुटुंबीयांना मिळाली नाही. 

  अश्रू अनावर

दरम्यान, अहेरी नगरपंचायतीचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला, पण तोपर्यंत संपूर्ण घरे जळून खाक झाली होती. या घटनेने तिघाही पिता - पुत्रांचा संसार उघड्यावर आला असून नुकसान पाहून कुटुंबांना अश्रू अनावर झाले होते. आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.