शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कुटुंबं गाढ झोपेत अन् तीन घरांना आगीचा वेढा; सुदैवाने जीवितहानी टळली, संसार उघड्यावर

By संजय तिपाले | Updated: March 3, 2024 14:28 IST

पहाटे साखरझोपेत असतानाच तीन घरांना आगीने कवेत घेतले. शेजाऱ्यांनी आरडाओरड करुन कुटुंबांना जागे केले अन् ते सुखरुप बाहेर आली, त्यानंतर काही क्षणातच तिन्ही घरे जळून खाक झाली.

गडचिरोली: पहाटे साखरझोपेत असतानाच तीन घरांना आगीने कवेत घेतले. शेजाऱ्यांनी आरडाओरड करुन कुटुंबांना जागे केले अन् ते सुखरुप बाहेर आली, त्यानंतर काही क्षणातच तिन्ही घरे जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली, पण या घटनेेने कुटुंबे उघड्यावर आली. ही घटना ३ मार्चला पहाटे अहेरी तालुक्यातील देवलमारीत घडली. आगीमागील कारण अस्पष्ट आहे.

अहेरीपासून १२ किलोमीटर अंतरावरील देवलमारी येथील मुत्तय्या मंचर्ला हे शेखर व संतोष या दोन मुलांसह राहतात. तिघांचीही स्वतंत्र घरे आहेत. २ मार्चला रात्री जेवण करुन सर्वजण आपापल्या घरी झोपी गेेले. पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरांना आग लागली. आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी तिघांनाही जागे केले. त्यानंतर ते कुटुंबासह घराबाहेर पडले. या आगीत धान्य, कपडे, भांडी व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आग एवढी भीषण होती की ती आटोक्यात आणण्याची संधीही मंचर्ला कुटुंबीयांना मिळाली नाही. 

  अश्रू अनावर

दरम्यान, अहेरी नगरपंचायतीचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला, पण तोपर्यंत संपूर्ण घरे जळून खाक झाली होती. या घटनेने तिघाही पिता - पुत्रांचा संसार उघड्यावर आला असून नुकसान पाहून कुटुंबांना अश्रू अनावर झाले होते. आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.