सध्या जिल्ह्यात गडचिरोलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर देसाईगंज हा तालुका असून तब्बल १४६ रुग्ण उपचार घेत आहेत. अजूनही तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कारवाईबाबत गंभीर झाल्याचे दिसून येत नाही. सकाळी भाजीबाजारात नागपूर तसेच शेजारील जिल्ह्यातून येणारे मालविक्रेते व खरेदीदार यांची शहरात गर्दी होत असते. पण शासन जरी कोरोना संसर्गाबाबत गंभीर असले तरी देसाईगंज स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कारवाईबाबत गंभीर नसल्याचे शहरात होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे. सध्या हे शहर जिल्ह्यातील कोरोना हाॕॅटस्पाॕॅट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे वेळीच आवर घालण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम सातत्याने सुरू करावी. सर्वच व्यापारी व भाजीपाला विक्रेते यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या सर्वच व्यापारउदिम ज्या ठिकाणाहून चालतात ते नागपूर शहर हे कोरोनाचे हाॅटस्पाट ठरलेले आहे. दररोज त्या ठिकाणाहून अनेक ट्रान्सपोर्टने माल शहरात पोहचत आहे. तसेच लगतच्या जिल्ह्यातील मालविक्रेते शहरात मोठ्या प्रमाणात येत आहेत.
===Photopath===
120421\12gad_15_12042021_30.jpg
===Caption===
देसाइगंज शहराच्या भाजी बाजारात उसळलेली गर्दी