शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या जलस्तरात कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:47 IST

गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कमालीची घटली आहे. या नदीवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना आहेत.

ठळक मुद्देधरणांचा परिणाम : पाणीपुरवठा योजनांना टंचाईचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कमालीची घटली आहे. या नदीवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना आहेत. पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठा योजनांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.गोसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणाची निर्मिती होण्यापूर्वी वैनगंगा नदीत मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी राहत होते.वैनगंगेची धार पार करणे सहज शक्य होत नव्हते. मात्र मागील चार वर्षांपासून गोसेखुर्द धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैनगंगेची बरीच पाणीपातळी कमी झाली आहे. तसेच चामोर्शीजवळ चिचडोह प्रकल्पही वैनगंगा नदीवरच बांधल्या गेला आहे. याही प्रकल्पासाठी पाणी अडविले जात आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे हरणघाट व त्यापुढील गावांच्या योजना अडचणीत आल्या आहेत.आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. त्याचबरोबर नदी, नाले आटल्याने भूजलातील पाण्याचा उपसा वाढला आहे. कमी पावसाचाही परिणाम नदीवरही झाला आहे. त्यामुळेही वैनगंगेची पाणीपातळी घटली आहे. डिसेंबर, मार्च महिन्यातच पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :riverनदी