शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

महसूल व कृषीच्या योजना गावापर्यंत पोहोचवा

By admin | Updated: August 18, 2016 01:31 IST

जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

 चर्चा : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना अहेरी : जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर योजना गावागावापर्यंत पोहोचवाव्या, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी दिल्या. सोमवारी अहेरीचे एसडीओ एस. राममूर्ती यांच्या दालनात विविध योजना व विकास कामांच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आलापल्ली हे मोठे वनग्राम १९७८-७९ मध्ये महसूल विभागाला हस्तांतरित करण्यात आले. मात्र या गावातील नागरिकांना व व्यावसायिकांना अस्थायी पट्टे स्थायी करून देण्यात आले नाही, असे नागरिकांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे आव्हाड यावेळी म्हणाले. याप्रसंगी एसडीओ एस. राममूर्ती, तहसीलदार जी. टी. पुरके, बीडीओ सुनील तडस, ठाणेदार संजय मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अण्णपूर्णा सिडाम, नगरसेवक व पत्रकार उपस्थित होते.