शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

माती मिळविण्यासाठी कसरत!

By admin | Updated: April 20, 2015 01:35 IST

अक्षय्य तृतीयेला पुजण्यासाठी लागणारी घागर बनविणे व उन्हाळ्यात वाढणारी माठांची मागणी पूर्ण करताना कुंभार व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

गडचिरोली : अक्षय्य तृतीयेला पुजण्यासाठी लागणारी घागर बनविणे व उन्हाळ्यात वाढणारी माठांची मागणी पूर्ण करताना कुंभार व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक ठिकाणी माती उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून किमान हजार रुपये देऊन एक ट्रॉलीभर माती आणावी लागत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शिवाय विविध भागांतून येणाऱ्या तयार वस्तूदेखील बाजारात दाखल आहेत. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांवर यंदा दुहेरी संकट उभे ठाकले आहे. कुंभार व्यावसायिकांचे मुख्य भांडवल हे योग्य पद्धतीची माती हे असते. जेवढी जवळ माती उपलब्ध होईल तेवढे भांडवल कमी लागते असे चित्र असते. परंतु सध्या विविध वस्तू बनविण्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची मातीच मिळत नसल्याचे दिसून येते. परिणामी उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असलेले माठ तयार करण्यासाठी यंदा कुंभार व्यावसायिकांची कसरत सुरू झाली आहे. शिवाय अक्षय्य तृतीयेला पुजेसाठी लागणारी घागरदेखील यंदा संकटात सापडली आहे. मातीचा तुटवड्यामुळे यंदा माठाचे भावही वधारणार अशी शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)जागेचाही प्रश्न कायमबाजारात वस्तू विक्रीसाठी जागाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होते. बाजारातील अनेक व्यापारी आपल्या दुकानांसमोर वस्तू विक्रीसाठी बसू देत नाहीत. अनेक कुंभार व्यावसायिक जागेअभावी रस्त्याच्या कडेला अपुऱ्या जागेत मातीच्या भांड्याचे दुकान लावतात. त्यामुळे पालिकेने कुंभार व्यवसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कुंभार व्यवसायिकांतर्फे होत आहे.मातीचे प्रकारमाठ, घागर, चूल, खापर, पणती यासह मातीच्या इतर विविध वस्तू तयार करण्यासाठी चिकट आणि लवकर एकजीव होणारी माती आवश्यक असते. अशी मातीची खाण ही विशिष्ट भागातच असते. पूर्वी नंदुरबारच्या दहा ते १५ किलोमीटरच्या परिसरात अशी माती सापडत होती. परंतु अशा ठिकाणी करण्यात येणारी शेती, खाजगी अतिक्रमण, बांधकाम यामुळे आता माती कुणीही घेऊ देत नाही. परिणामी माती मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. माती मिळविण्यासाठी रॉयल्टीचाही प्रश्नच येतो. कुंभार व्यावसायिकांसाठी मातीची रॉयल्टी माफ करण्याचीही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. परंतु त्याकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. रेडिमेड वस्तूंमुळेदेखील या व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे. तयार मटके, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या वस्तूंमुळे मातीचे मटके व घागर, चूल यांना मागणी राहत नसल्याचे कुंभार बांधवांनी सांगितले आहे.