लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : सन २०१८ पासून अहेरी तालुक्यात आम्ही मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मात्र आता मतदार यादीत सर्वेक्षणाच्या कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी अहेरी तालुक्यातील शिक्षकांनी केली आहे.यासंदर्भात अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना शिक्षकांनी निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. निवेदनावर श्रीकांत राऊत, सुरेश दासरवार, राजेश अल्लीवार, डुंगाराम वेलादी, अशोक कांदो, निशिकांत निमसरकार, प्रशांत चव्हाण, सत्यवान खोब्रागडे, नारायण सिडाम, रितेश येनगंटीवार, अजय सोनलवार, मुकूंद सडमेक, जयंत दुर्गे, श्रीनिवास गौतम, संजय कोकमुटीवार, संजय येलमवार, विस्तारी तलांडे यांच्यासह इतर शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे सर्व शिक्षक दुर्गम भागातील जि.प.शाळांमध्ये कार्यरत आहेत.निवेदनात म्हटले आहे की, मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण हे काम सतत चालणारे शासनाचे काम आहे. परंतु या कामाचा शिक्षकांना त्रास होत आहे. त्यातच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची वेळोेवेळी चाचणी अध्ययनस्तरनुसार पडताळणी तसेच इतर शालेय कामे शिक्षकांना करावयाच्या आहेत. शिक्षकांना असे अशैक्षणिक कामे दिल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अहेरी तालुक्यातील शिक्षकांची मतदान नोंदणी अधिकारी या पदावरून मुक्तता करावी, अशी मागणी निवेदनातून शिक्षकांनी केली आहे.
निवडणूक कामातून वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST
सन २०१८ पासून अहेरी तालुक्यात आम्ही मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मात्र आता मतदार यादीत सर्वेक्षणाच्या कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी अहेरी तालुक्यातील शिक्षकांनी केली आहे.
निवडणूक कामातून वगळा
ठळक मुद्देशिक्षकांची मागणी : अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन