शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

दहावी-बारावीच्या २९ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील २९ हजार विद्यार्थी बसणार आहेत.

ठळक मुद्दे२१ पासून सुरुवात : बारावीसाठी ४८ तर दहावीसाठी ७४ केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील २९ हजार विद्यार्थी बसणार आहेत. सदर परीक्षा निकोप आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी करण्यात आली आहे.जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सदर परीक्षांबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा बारावीचे १३ हजार ९६० तर इयत्ता दहावीचे १५ हजार ९७४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने बारावीच्या परीक्षेसाठी ४८ तर दहावीच्या परीक्षेसाठी ७४ केंद्र ठेवण्यात आले आहेत.बोर्डाची दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शेखर सिंह व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ६ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक पार पडली. त्यानंतर ११ फेब्रुवारीला गटशिक्षणाधिकारी व परिरक्षकांची बैठक गडचिरोली येथे पार पडली. जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली यंदा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. महसूल व शिक्षण विभागाच्या समन्वयातून ही परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यात येणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी शिक्षण विभागाला सहकार्य करावे, असे लेखी आदेश जिल्हाधिकाºयांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.चार नवीन केंद्र, एक केंद्र बदललेजि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी दोन नवीन परीक्षा केंद्रांना मंजुरी दिली आहे. तसेच एक केंद्र बदलविण्यात आले आहे. नव्या केंद्रांमध्ये विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा व प.पु. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोट यांचा समावेश आहे. यापूर्वी गिलगाव बा. येथील साईबाबा विद्यालयात इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र राहात होते. मात्र हे केंद्र रद्द करण्यात आले असून या केंद्राऐवजी अमिर्झा येथील कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय हे केंद्र राहणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा दोन नवे परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामध्ये भगवंतराव आश्रमशाळा राजाराम खांदला व भगवंतराव हायस्कूल गोमणी यांचा समावेश आहे.सहा भरारी पथकांची नजरइयत्ता बारावी व दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक जिल्हाभरातील सर्व केंद्रांवर टप्प्याटप्याने धाडी टाकणार आहेत. या भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्राचार्य डायट तसेच महिला भरारी पथकाचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक विषयासाठी व प्रत्येक केंद्रांवर पेपरच्या कालावधीमध्ये पूर्ण तीन तास बैठे पथकही कार्यरत राहणार आहे.

टॅग्स :examपरीक्षा