शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

काेराेनाच्या संकटातही सांस्कृतिक कार्यक्रम जाेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST

देसाईगंज : काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका अद्यापही टळला नाही. दरराेज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अटी ...

देसाईगंज : काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका अद्यापही टळला नाही. दरराेज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अटी व शर्थीनुसार परवानगी दिली असली तरी काेविड-१९ चे नियम धाब्यावर बसवून अनावश्यक गर्दी हाेणारे कार्यक्रम देसाईगंज तालुक्यात सर्रास आयाेजित केले जात आहेत. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. नियमाची कठाेर अंमलबजावणी करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.देसाईगंज तालुक्यात काेराेनाचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तरी सुद्धा नियमाचे पालन करून सार्वजनिक कार्यक्रम व विवाह साेहळे पार पाडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी आदेशाची पायमल्ली करून सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय पक्षाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व लग्न साेहळे आयाेजित केले जात आहेत. यादरम्यान हाेत असलेल्या गर्दीमुळे काेराेनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच पाश्चिमात्य देशातून काेराेना नवीन रुपात आपल्या देशात आल्याने अनेक रुग्णही आढळून आले. असे असतानाही गाव पातळीवर परवानगीशिवाय नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न साेहळे व अन्य कार्यक्रम सादर केले जात आहेत. त्यामुळे नियमांची पायमल्ली करून कार्यक्रम सादर करणे अनेकांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. देसाईगंजला झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे जवळपास ५५ नाट्य कंपन्यांच्या माध्यमातून चार जिल्ह्यात नाटकांचे सादरीकरण हाेते. काेराेनामुळे माेजक्याच ठिकाणी नाटके सादर केली जात आहेत. परंतु अन्य कार्यक्रम सर्रास हाेत असल्याने काेराेनाच्या संसर्गाचा धाेका बळावला आहे.

बाॅक्स...

आयाेजकांवर कारवाईच नाही

विशेष म्हणजे, विनापरवानगी नाटक, लग्न साेहळे, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्यांवर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, पाेलिसांनाही याबाबत कुठल्याही प्रकारचे निर्देश देण्यात आले नाही. सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून काेराेनाचा उद्रेक झाल्यास यास काेण जबाबदार राहणार, असा प्रश्न केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अनाधिकृतपणे व नियमांना डावलून गर्दीचे कार्यक्रम घेणाऱ्या आयाेजकांवर कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.