शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

पावसाळा संपूनही एसटीच्या 25% बसेस आगारातच उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:35 IST

अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था,एसटीचे सुटे भाग उपलब्ध नसणे, डिझेलची कमरता यामुळे गडचिराेली व अहेरी आगारातील २५ टक्के बसेस आगारातच पडून राहतात. यावरून एसटीची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय हाेत असल्याचे दिसून येत आहे. अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे. प्रवासी देखील तासनतास बसस्टँडवर बसची वाट पाहत  असतात. खासगी वाहनांचे तिकीट दर वाढले असले तरी प्रवाशांना नाईलाजाने त्यांच्याकडेच जावे लागत आहे. 

यांत्रिकांचीही वानवाअहेरी आगारात एकूण ८६ बसेस वाहने आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी व देखभालीसाठी ७४ यांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु आजच्या स्थितीत अहेरी आगारात केवळ २६ यांत्रिक कर्मचारीच आहेत. ६० यांत्रिकी कर्मचाऱ्यांची पदे रिकामी आहेत. 

पावसाळ्यानंतरही रस्त्यांची दैनावस्था कायम -    पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य नाही. असे बांधकाम विभागाकडून सांगितले जात हाेते. आता मात्र पावसाळा संपला आहे. तरीही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. -    अहेरीवरून सिराेंचासाठी दिवसातून एकाच बसच्या दाेन फेऱ्या हाेत हाेत्या,आता केवळ एकच फेरी हाेते. दाेन फेऱ्यांसाठी जेवढा वेळ लागते तेवढाच वेळ आता एकाच फेरीसाठी लागत असल्याने अधिक प्रमाणात डिझेल लागते. त्यामुळे एसटीचा ताेटा वाढत चालला आहे. 

डिझेलचा खर्चही भरून निघणे कठीणरत्यांच्या दुरवस्थेमुळे एसटीची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. इच्छित स्थळी पाेहाेचण्यासाठी आता दुप्पट कालावधी लागत आहे. तेवढा वेळ बस सुरूच राहत असल्याने दुप्पट डिझेल लागत आहे. प्रवासी मात्र तेवढेच मिळत असल्याने उत्पन्नात वाढ झाली नाही. परिणामी आगाराचा ताेटा वाढत चालला आहे.

बस वेळेवर कशी पाेहाेचणार?अहेरी आगारात मानव विकास मिशनच्या एकून ४२ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस दरराेज विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी साेडल्या जातात. मात्र रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने बस पाेहाेचण्यास उशीर हाेतो. बस आगारात आल्यानंतर तिची हमखास दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे पुन्हा उशीर हाेते. त्यातच काही वेळेला साहित्य राहत नाही. परिणामी बस आगारातच उभी ठेवावी लागते. 

 

टॅग्स :state transportएसटी