शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पावसाळा संपूनही एसटीच्या 25% बसेस आगारातच उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:35 IST

अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था,एसटीचे सुटे भाग उपलब्ध नसणे, डिझेलची कमरता यामुळे गडचिराेली व अहेरी आगारातील २५ टक्के बसेस आगारातच पडून राहतात. यावरून एसटीची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय हाेत असल्याचे दिसून येत आहे. अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे. प्रवासी देखील तासनतास बसस्टँडवर बसची वाट पाहत  असतात. खासगी वाहनांचे तिकीट दर वाढले असले तरी प्रवाशांना नाईलाजाने त्यांच्याकडेच जावे लागत आहे. 

यांत्रिकांचीही वानवाअहेरी आगारात एकूण ८६ बसेस वाहने आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी व देखभालीसाठी ७४ यांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु आजच्या स्थितीत अहेरी आगारात केवळ २६ यांत्रिक कर्मचारीच आहेत. ६० यांत्रिकी कर्मचाऱ्यांची पदे रिकामी आहेत. 

पावसाळ्यानंतरही रस्त्यांची दैनावस्था कायम -    पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य नाही. असे बांधकाम विभागाकडून सांगितले जात हाेते. आता मात्र पावसाळा संपला आहे. तरीही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. -    अहेरीवरून सिराेंचासाठी दिवसातून एकाच बसच्या दाेन फेऱ्या हाेत हाेत्या,आता केवळ एकच फेरी हाेते. दाेन फेऱ्यांसाठी जेवढा वेळ लागते तेवढाच वेळ आता एकाच फेरीसाठी लागत असल्याने अधिक प्रमाणात डिझेल लागते. त्यामुळे एसटीचा ताेटा वाढत चालला आहे. 

डिझेलचा खर्चही भरून निघणे कठीणरत्यांच्या दुरवस्थेमुळे एसटीची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. इच्छित स्थळी पाेहाेचण्यासाठी आता दुप्पट कालावधी लागत आहे. तेवढा वेळ बस सुरूच राहत असल्याने दुप्पट डिझेल लागत आहे. प्रवासी मात्र तेवढेच मिळत असल्याने उत्पन्नात वाढ झाली नाही. परिणामी आगाराचा ताेटा वाढत चालला आहे.

बस वेळेवर कशी पाेहाेचणार?अहेरी आगारात मानव विकास मिशनच्या एकून ४२ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस दरराेज विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी साेडल्या जातात. मात्र रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने बस पाेहाेचण्यास उशीर हाेतो. बस आगारात आल्यानंतर तिची हमखास दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे पुन्हा उशीर हाेते. त्यातच काही वेळेला साहित्य राहत नाही. परिणामी बस आगारातच उभी ठेवावी लागते. 

 

टॅग्स :state transportएसटी