शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सुयोग्य व्यवस्थापनाने मूल्यांकन समितीही थक्क

By admin | Updated: January 28, 2015 23:32 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कसारी गावाने यावर्षी राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत सहभाग घेतला. नियमानुसार या गावाने सर्व निकष व अटी पूर्ण

देसाईगंज : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कसारी गावाने यावर्षी राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत सहभाग घेतला. नियमानुसार या गावाने सर्व निकष व अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कसारी गावाने केलेल्या विकासात्मक व्यवस्थापन पाहून अखेर मूल्यांकन समितीही थक्क झाली. केलेल्या श्रमाचे फळ पुरस्कार रूपाने गावकऱ्यांना निश्चितच मिळेल, असा आशावादही समितीच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. कसारी गावाचे मूल्यांकन करण्यासाठी बुधवारी अमरावती येथील जिल्हा मूल्यांकन समिती गावात दाखल झाली. या समितीत प्रामुख्याने अमरावती विभागाच्या उपायुक्त प्रीती देशमुख, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त चव्हाण, चौकशी उपायुक्त सुनिल निकम, शिक्षणाधिकारी भाऊ टेकाम, पंचायत विस्तार अधिकारी उलेमाने आदींचा सहभाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धात्मक दृष्टिकोन समोर ठेऊन जिद्द व चिकाटीच्या बळावर यापूर्वी अनेक पुरस्कारप्राप्त कसारी हे गाव नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या नावलौकीकात आधीच मानाचा तुरा रोवणारे आदर्श गाव ठरले आहे. या गावाने सन २०१२-१३ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकाविला. तर मार्गदर्शनाअभावी काही गुण कमी पडल्याने राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार निसटला. संपूर्ण गाव स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार व त्यासाठी आवश्यक त्या श्रमदानाची तयारी या भरवशावर पुन्हा या गावाने निराश न होता. या स्पर्धेत कसारी गावाने सहभाग नोंदविला होता. त्यादृष्टीने गावाचे मूल्यांकन करण्यासाठी अमरावतीची जिल्हा मूल्यांकन समिती गावात दाखल झाली व समितीच्या सदस्यांनी या गावाचे मूल्यांकन केले. यावेळी समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांनी श्रमदानातून तयारी केलेली परसबाग, बगीचा, जलशुद्धीकरण व व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड, पाणीस्त्रोत, सौर ऊर्जेचा वापर, बायोगॅस, प्लास्टिक बंदी, कुऱ्हाड बंदी, कुटुंब नियोजन, गावातील जातीय सलोखा, एक गाव एक पानवठा, सांडपाण्याचे व्यवस्थापन याबाबत तपासणी केली. तसेच ग्रामपंचायतीच्या दफ्तराची तपासणी करून १०० टक्के कर वसुली, शौचालयाची कामे, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना दिलेला लाभ, घरकूल, १५ टक्के वैयक्तिक लाभाच्या योजना, बचतगटांना दिलेले कर्ज, याबाबत समितीने गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून तसेच घरोघरी जाऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान समितीच्या सदस्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. शासन, प्रशासन आपल्या पाठीशी आहे, अशी हमी दिली. याप्रसंगी पं. स. सभापती प्रीती शंभरकर, उपसभापती नितीन राऊत, शिवाजी राऊत, जि. प. सदस्य पल्लवी लाडे आदींसह पं. स. चे सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)