शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी एटापल्लीचे प्रशासन सज्ज

By admin | Updated: April 20, 2015 01:30 IST

तालुक्यातील नऊ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २४ एप्रिल रोजी होणार असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

एटापल्ली/चामोर्शी : तालुक्यातील नऊ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २४ एप्रिल रोजी होणार असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, उडेरा, गेदा, गुरूपल्ली, येमली, सोहगाव, जारावंडी, बुर्गी, दिवडी या नऊ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या नऊ ग्राम पंचायतींमध्ये ९ हजार ८१२ स्त्री तर १० हजार २६८ पुरूष मतदार आहेत. या सर्वच ग्राम पंचायती नक्षलप्रभावी क्षेत्रामध्ये मोडतात. ग्राम पंचायत निवडणुकीत नागरिकांनी उभे राहू नये, यासाठी नक्षलवाद्यांच्या वतीने नेहमी पत्रकबाजी करण्यात येत आहे. तरीही नागरिकांनी नक्षल्यांच्या पत्रकबाजीला न जुमानता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावरून गावकऱ्यांमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीविषयी कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरू नये, जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाच्या वतीनेही जोमात तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी नक्षल्यांकडून घातपाताच्या कारवाया करून मतदानाच्या प्रक्रियेत बाधा आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस पथकांच्या वतीने या भागात नक्षल शोध मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहेत. एका ग्राम पंचायतीमध्ये पाच ते सहा गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावाचे अंतर चार ते पाच किमी आहे. नागरिकांना एवढ्या दूर अंतर चालत येऊन मतदान करण्याची पाळी येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने गावनिहाय ३६ मतदान केंद्र निर्माण केले आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.