शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नोकर भरतीसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:04 IST

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे जिल्ह्यातील नोकर भरतीकरिता स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक युवक-युवती उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना स्थान द्यावे, जिल्ह्यातील पोलीस भरती, वन विभाग, महसूल विभाग, जिल्हापरिषद, आरोग्य विभागातील विविध भरत्यांमध्ये निवड मंडळांच्या माध्यमातून स्थानिकांना संधी द्यावी. स्थानिक बेरोजगारांना संधी दिल्यास येथील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्हा विस्ताराने खुप मोठा असून अहेरी उपविभागातील बहुतांश गावे अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात आहेत. येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात विविध कामानिमित्त येताना जवळपास अडीचशे किमीचे अंतर कापावे लागते. आर्थिकदृष्ट्या ये-जा करणे त्यांना परवडत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारChief Ministerमुख्यमंत्री