शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

पर्यावरण संवंर्धन प्रत्येकाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

गडचिरोली: भाैतिक प्रगती करताना पर्यावरण व वसुंधरेची हानी हाेणार नाही. याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री ...

गडचिरोली: भाैतिक प्रगती करताना पर्यावरण व वसुंधरेची हानी हाेणार नाही. याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने माझी वसुंधरा या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी शपथ देण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्र्यानी ऑनलाईन मार्गदर्शन केले. जिल्हयात नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह जिल्हाधिकारी कार्यालयात हरित शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद , निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपादेे, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, कल्पना निळ व इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, हे अभियान वातावरणीय बदलांमूळे झालेले नुकसान भरुन काढण्यास मदत करेल. वातावरणीय बदल हे देशापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला त्याने ग्रासले आहे. आपण भौतिक प्रगती साधत असताना आपल्या वसुंधरेचे अस्तित्व धोक्यात येत आहे. निसर्गाकडून घेत असताना त्याला आपण देणेही लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे आणि याच आधारावर माझी वसुंधरा अभियानाची आखणी करण्यात आली आहे. निसर्गाच्या, पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोक एकत्र आले पाहिजेत. अभियान ही लोकचळवळ उभी करण्यासाठीचा एक मार्ग आहे. परंतु ही चळवळ शासनाच्या किंवा सरकारपूरती मर्यादित राहता कामा नये. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले.