शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:18 PM

देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते.

ठळक मुद्देशेतात जेसीबी चालविली : बोळधा येथे वन विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमतकोरेगाव/चोप : देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते. संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावूनही अतिक्रमण कायमच राहिले. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने संबंधित अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण हटविले. सदर कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास वडसा वन विभागचे सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे व वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार यांनी पोलीस बंदोबस्तात पार पाडली.बोळधा येथील सर्वे नंबर ४५६/१ मधील ३३.८२ हेक्टरपैकी १.७९१ हेक्टर इतक्या संरक्षित वन जमिनीवर बोळधा येथील रतीराम भिवा गायकवाड, मुरलीधर धर्मा मेश्राम, पुंडलिक तिमा गायकवाड, विश्वनाथ तुकाराम गायकवाड व गोपाल विनायक सुकारे या पाच शेतकºयांनी अतिक्रमण घेऊन पीक घेणे सुरू केले होते. शासन निर्णयानुसार पाचही शेतकºयांनी शेती कसणे सुरू केले. दरम्यान वन विभागांनी या शेतकºयांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजाविली. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने वनाधिकाºयांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने या संरक्षित वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले. या कारवाईमुळे जंगलात अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.संरक्षित वन जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याच्या मुद्यावर वनाधिकाºयांनी ठोस भूमिका घेतली. त्यानंतर पुढाकार घेऊन संरक्षित वनाची जागा आपल्या ताब्यात घेतली व त्यानंतर या ठिकाणी नाली खोदण्यात आली.जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे, वन परिक्षेत्राधिकारी एन. जी. चांदेवार, जांभुळे, क्षेत्र सहायक मेनेवार, माडावार, ठाकरे, कोसमसिले, वनपाल वंजारी, कुंभरे यांच्यासह वनरक्षक, वनमजूर आदींनी केली. सदर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान देसाईगंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. बहुप्रतिक्षेनंतर अतिक्रमण काढण्यात आले.स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी यापूर्वी आंदोलनबोळधा हे गाव देसाईगंज तालुक्यात वन जमीन अतिक्रमणाच्या जास्तीत जास्त भागाने व्यापला आहे. पाच वर्षांपूर्वी या अतिक्रमणधारकांच्या वाढत्या हिंमतीमुळे येथे मृतदेह पुरण्यासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे चक्क ग्रामपंचायत कार्यालयात मृतदेह नेऊन मशानभूमीची जागा मोकळी करा, नाही तर मृतदेह गावात पुरण्यासाठी परवानगी द्या, या मागणीकरिता आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर तत्कालीन पोलीस निरिक्षक दीपक निकम यांनी तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी यांना पाचारण करून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई त्यावेळी केली होती.