शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

वन हक्काच्या नावाखाली जंगलावर वाढतेय अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 17:57 IST

जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र घटले: पर्यावरणाला पोहोचतोय धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलाचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, वन हक्काच्या नावाखाली अनेक धनिक लोकांनी जमिनी बळकावल्या. ज्या ठिकाणी जंगल होते, ते नष्ट करून शेतजमिनी काढल्या. मोठ्या प्रमाणात जंगलाचा भूभाग नष्ट केला. पर्यावरण व पर्यावरणाचे घटक नष्ट झाले. लहान तलाव, बोड्या होत्या. त्या नष्ट करून शेतजमिनी तयार करण्यात आल्या. त्यातील पर्यावरणाचे घटक नष्ट झाले. गेल्या काही वर्षांपासून वन हक्काच्या नावाखाली जंगलावर वाढत असलेले अतिक्रमण पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. 

ज्याच्याजवळ जमिनीचा तुकडा नाही, अशा गरीब व्यक्तीला हक्काची जमीन मिळावी यासाठी सन २००६ मध्ये वन हक्क कायदा आला. एकेकाळी गडचिरोली जिल्ह्यात ७२ टक्के वनव्याप्त भाग होता, तो कधी ५२ टक्क्यांवर आला, हे कळले नाही. गडचिरोलीकर आजही ७२ टक्के जंगलाचा दिंडोरा पिटत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ७२ टक्के जंगल असलेला वनव्याप्त भाग कमी होण्याला शासनाची अनेक धोरणे कारणीभूत आहेत. जिल्ह्यातील जास्त घनतेच्या फार मोठ्या जंगलाची एफडीसीएमने कत्तल केली. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी घनदाट जंगल होते, ते जंगल वनविभागाने वनविकास महामंडळाकडे वर्ग केले आणि ते संपूर्ण घनदाट जंगल एफडीसीएमने सपाट केले. उरलेले जंगल जिल्ह्यातील सहकारी संस्थांना कुपकामापोटी लिलावात देण्यात आल्या. संस्थांकडून वनाची हानी झाली. ती इतकी भयंकर आहे की, येत्या ५० वर्षांत भरून निघणे कठीण झाले आहे.

झुडपी जंगलही होताहे नष्टआरमोरी वन परिक्षेत्रासह अनेक ठिकाणचे झुडपी जंगल नष्ट होताना दिसून येत आहे. नागरिकांचे वाढते अतिक्रमण, वाढते शहरीकरण तसेच विविध सरकारी कामांसाठी जागा दिल्या जात असल्याने गाव व शहरालगतच्या झुडपी जंगलाचे क्षेत्र कमी होत आहे. पूर्वीसारखे झुडपी जंगल आता गावाजवळ दिसून येत नाही. मोठे जंगल व झुडपी जंगलाचे संरक्षण करणे आता आवश्यक झाले आहे.

वृक्षतोडीवर सक्त कारवाई नाहीआजही ग्रामीण भागात वीटभट्ट्या लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. पण, वनविभागाकडून अशा अवैध वृक्षतोडीवर सक्त कारवाई होताना दिसत नाही. कुंपणासाठी, जळावू लाकूड, सरपण यासाठी झाडे तोडली जातात. एकेकाळी गावालगत असणारे जंगल आता गावापासून कोसो दूर गेले आहेत. वृक्षतोड करणाऱ्यांच्या विरोधात वनविभाग कठोर कारवाई करीत नसल्याने जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र घटले आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी वन विभागाने तसेच शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :forestजंगलEnchroachmentअतिक्रमणGadchiroliगडचिरोली