शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

विद्युत कार्यालयावर धडक

By admin | Updated: June 23, 2014 23:51 IST

भारनियमन व वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात कोरची येथील मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करून वीज वितरण कंपनीच्या

कोरची : भारनियमन व वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात कोरची येथील मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तालुक्यातील विजेच्या संबंधित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदारांना युवाशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाव्दारे यावेळी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात कोरचीचे ११ केव्ही. फिडर वेगळे करण्यात यावे, जिल्हा भारनियमन मुक्त करून तालुक्यातील भारनियमन बंद करावे, कोरची तालुक्यातील सबस्टेशनमधील रिक्त पदे तत्काळ भरावे, विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने ३ ते ४ दिवस लोटूनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे अनेक कामकाज ठप्प पडतात. उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित राहत नाहीत व नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखलही घेत नाही. याकडे लक्ष द्यावे, सहाय्यक अभियंत्याच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तालुक्यातील ग्राहकांना अजुनपर्यंत वीज कनेक्शन देण्यात आले नाही. दोन वर्षापासून अनेकांना वीज बिलही मिळत नाही. त्यामुळे वीज बिल देण्यात यावे, कोटगूल क्षेत्रातील नागरिकांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागते. त्यामुळे ३३ के व्ही. कोरची ते कोटगुल लाईन त्वरित सुरू करावी, ट्री कटींग पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावी, कुरखेडाकडून जाणारी ३३ केव्ही लाईन पूर्ण झाली असून ती त्वरित सुरू करावी, बिजेपार येथे ४ ते ५ महिन्यापूर्वी ट्रान्सफार्मर देण्यात आले. परंतु नागरिकांना अजुनपर्यंत डिमांड देण्यात आले नाही. त्यामुळे त्वरित डिमांड द्यावे, कोरची तालुक्यातील रिक्त पदे त्वरित भरावीत, शेतकऱ्यांना कृषी वीज कनेक्शन त्वरित द्यावे, ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन देतेवेळी रिपोर्टविषयी आवश्यक सूचना लावाव्या, मागील ३ वर्षापासून रखडलेले मेंटनंस व काढलेल्या कंत्राटातील इस्टीमेट त्वरीत तयार करावे, विद्युत खांबावर बेरोजगार युवकांना चढविले जाते. यासाठी जबाबदार कुणाला धरायचे या विषयी प्रशासनाने विचार करावा, मीटरचे रिडींग करतांना अतिरिक्त बिल आकारले जातात. अतिरिक्त बिल नागरिकांना देऊ नये, रोहित्र नादुरूस्त झाल्यास तालुक्यातील नागरिक दोन ते तीन महिने अंधारात राहतात. त्यामुळे उपविभागात अतिरिक्त रोहित्र उपलब्ध करून द्यावे, तालुक्यातील गावातील टोलींवर वाढीव विद्युत खांबांची अजुनपर्यंत व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे विद्युत खांबांची व्यवस्था करावी आदींचा समावेश होता. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवाशक्तीचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, चांगदेव फाये, अशोक गावतुरे, नासिर भामानी, सुनंदा आतला, पद्माकर मानकर, अरूण नायक, गोविंदराव दरवडे, शालिनी आंदे, निजाम साय काटेंगे, भिमराव भैसारे, गुड्डू अग्रवाल यांनी दिला आहे.