शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षात घटले १७७ चौरस किलोमीटरचे जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. २०११ च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दर दोन वर्षांनी प्रकाशित रिपोर्टनुसार जंगलाचे प्रमाण घटत चालले असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील स्थिती : इंडिया स्टेट आॅफ फॉरेस्टचा अहवाल, पर्यावरणासाठी धोक्याची घंटा

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक जंगलाचा भूभाग असणारा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र ही ओळख काही वर्षानंतर पुसल्या जाणार की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल मागील आठ वर्षांत सुमारे १७७.०६ चौरस किलोमीटरने घटले असल्याची बाब समोर आली आहे. दरवर्षी जंगलाचे क्षेत्र घटत असल्याने ही वनविभागासाठी आणि पर्यावरणासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.भारतीय वन सर्वेक्षण विभागामार्फत दर दोन वर्षांनी इंडिया स्टेट आॅफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित केला जातो. २०१९ चा रिपोर्ट नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील घटत्या वनक्षेत्राचे चित्र स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जंगलाचे महत्त्व असल्याने शासन जंगल संरक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. तरीही मागील काही वर्षात विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने जंगलाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. २०११ च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दर दोन वर्षांनी प्रकाशित रिपोर्टनुसार जंगलाचे प्रमाण घटत चालले असल्याचे दिसून येत आहे.२०१९ च्या रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाचे क्षेत्र ९९१६.९४ चौ.किमी असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानुसार एकूण भूभागावरील जंगलाचे प्रमाण २०११ च्या तुलनेत १.२३ टक्क्यांनी घटून ६८.८१ टक्के झाले आहे. २०११ ते २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत सुमारे १७७ चौरस किलोमीटर जंगल कमी झाले आहे. राज्याबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातीलही जंगल कमी होणे ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे.दोन वर्षांत ८७ चौरस किमी जंगल झाले कमीइंडिया स्टेट आॅफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार २०१७ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार ४ चौरस किमी जंगल होते. २०१९ मध्ये ९ हजार ९१६ चौरस किमी जंगल शिल्लक आहे. मागील दोन वर्षांत ८७ किमी जंगल कमी झाले आहे. यावरून जंगलाची तोड मागील दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे दिसून येत आहे. जंगल तोडीचे हे प्रमाण कायम राहिल्यास भविष्यात जंगलच शिल्लक न राहण्याचा धोका नाकारता येत नाही.८० ते १०० वर्ष वय झालेली जवळपास ५ हजार हेक्टरवरील झाडे दरवर्षी तोडली जातात. या ठिकाणी नवी रोपांची लागवड केली जाते. राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत २०१६ ते २०१९ या चार वर्षांच्या कालावधीत १५ हजार हेक्टरवर वृक्ष लागवड झाली आहे. नवीन रोपे लहान असल्याने ती सॅटेलाईच्या नजरेत येत नाही, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही झाडे वाढल्यानंतर क्षेत्र वाढल्याचे दिसेल, असे त्यांना वाटते.

टॅग्स :forest departmentवनविभाग