शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आठ वर्षात घटले १७७ चौरस किलोमीटरचे जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. २०११ च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दर दोन वर्षांनी प्रकाशित रिपोर्टनुसार जंगलाचे प्रमाण घटत चालले असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील स्थिती : इंडिया स्टेट आॅफ फॉरेस्टचा अहवाल, पर्यावरणासाठी धोक्याची घंटा

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक जंगलाचा भूभाग असणारा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र ही ओळख काही वर्षानंतर पुसल्या जाणार की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल मागील आठ वर्षांत सुमारे १७७.०६ चौरस किलोमीटरने घटले असल्याची बाब समोर आली आहे. दरवर्षी जंगलाचे क्षेत्र घटत असल्याने ही वनविभागासाठी आणि पर्यावरणासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.भारतीय वन सर्वेक्षण विभागामार्फत दर दोन वर्षांनी इंडिया स्टेट आॅफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित केला जातो. २०१९ चा रिपोर्ट नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील घटत्या वनक्षेत्राचे चित्र स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जंगलाचे महत्त्व असल्याने शासन जंगल संरक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. तरीही मागील काही वर्षात विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने जंगलाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. २०११ च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दर दोन वर्षांनी प्रकाशित रिपोर्टनुसार जंगलाचे प्रमाण घटत चालले असल्याचे दिसून येत आहे.२०१९ च्या रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाचे क्षेत्र ९९१६.९४ चौ.किमी असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानुसार एकूण भूभागावरील जंगलाचे प्रमाण २०११ च्या तुलनेत १.२३ टक्क्यांनी घटून ६८.८१ टक्के झाले आहे. २०११ ते २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत सुमारे १७७ चौरस किलोमीटर जंगल कमी झाले आहे. राज्याबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातीलही जंगल कमी होणे ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे.दोन वर्षांत ८७ चौरस किमी जंगल झाले कमीइंडिया स्टेट आॅफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार २०१७ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार ४ चौरस किमी जंगल होते. २०१९ मध्ये ९ हजार ९१६ चौरस किमी जंगल शिल्लक आहे. मागील दोन वर्षांत ८७ किमी जंगल कमी झाले आहे. यावरून जंगलाची तोड मागील दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे दिसून येत आहे. जंगल तोडीचे हे प्रमाण कायम राहिल्यास भविष्यात जंगलच शिल्लक न राहण्याचा धोका नाकारता येत नाही.८० ते १०० वर्ष वय झालेली जवळपास ५ हजार हेक्टरवरील झाडे दरवर्षी तोडली जातात. या ठिकाणी नवी रोपांची लागवड केली जाते. राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत २०१६ ते २०१९ या चार वर्षांच्या कालावधीत १५ हजार हेक्टरवर वृक्ष लागवड झाली आहे. नवीन रोपे लहान असल्याने ती सॅटेलाईच्या नजरेत येत नाही, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही झाडे वाढल्यानंतर क्षेत्र वाढल्याचे दिसेल, असे त्यांना वाटते.

टॅग्स :forest departmentवनविभाग