शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

गडचिरोली जिल्ह्यात आठ ट्रॅक्टर सागवानाचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:50 IST

अहेरी तालुक्यातील जामगाव येथील नागरिकांकडून जवळपास १० लाख रुपये किमतीचे सुमारे आठ ट्रॅक्टर सागवानी लाकडाचे साहित्य आढळून आले आहे.

ठळक मुद्देजामगाव येथे कारवाई१० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील जामगाव येथील नागरिकांकडून जवळपास १० लाख रुपये किमतीचे सुमारे आठ ट्रॅक्टर सागवानी लाकडाचे साहित्य आढळून आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवानाचे साहित्य आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.जामगाव हे गाव आलापल्ली-आष्टी मार्गावरील चिंतलपेठ फाट्यापासून सात किमी अंतरावर आहे. सदर गाव पेडीगुड्डम वन परिक्षेत्रांतर्गत येते. जामगाव येथे मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची तोड करून त्यापासून पाट्या, पलंग, दरवाजे, खिडक्या व अन्य साहित्य बनविले जात असल्याची गोपनिय माहिती वन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार वन विभागाच्या जवळपास ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल रोजी जामगाव गाठून तेथील नागरिकांच्या घरांची तपासणी करण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवशी जवळपास दोन ट्रॅक्टर सागवाने साहित्य आढळून आले. रात्री उशीर झाल्याने कारवाई थांबवून पुन्हा दुसऱ्या दिवशी २ एप्रिल रोजी तपासणी सुरू केली. दुसऱ्या दिवशीही काही नागरिकांच्या घरी सागवानी साहित्य आढळून आले. पुन्हा तिसºया दिवशी ३ एप्रिल रोजी जामगाव परिसरातील शेतशिवार व नाल्यांमध्ये सागवानी साहित्य आढळून आले. वन विभागामार्फत तपासणी मोहीम सुरूच असून ३ एप्रिलपर्यंत सुमारे आठ ट्रॅक्टर सागवानी साहित्य जप्त करण्यात आले आहे.१ एप्रिल रोजी कारवाई झाल्यानंतर काही नागरिकांनी घरामध्ये लपवून ठेवलेले साहित्य गावाच्या जवळ असलेल्या नाल्यांमध्ये फेकून दिले. सदर साहित्य सुध्दा जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत आठ ट्रॅक्टर सागवानाचे साहित्य व लाकूड आढळून आले आहेत. त्यांची किंमत जवळपास १० लाख रुपये एवढी होते. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून सात आरोपी फरार आहेत. वन विभागामार्फत तपासणी मोहीम सुरूच आहे.२४ मार्चपासून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. याचा गैरफायदा उचलत जामगाव येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून विविध प्रकारचे साहित्य बनविण्यास सुरूवात केली होती. विशेष म्हणजे, वन विभागाचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांना कोरोनाशी संबंधित कोणतेही काम सोपविण्यात आले नव्हते. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या ही बाब कशी काय लक्षात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी