शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

आठ तालुके अजुनही पावसासाठी आसुसलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 05:00 IST

११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १२५.६ टक्के आहे. त्या खालोखाल १४२३.९ मिमी पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९२ टक्के पाऊस : केवळ चार तालुक्यांनी गाठली सरासरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत १२५४ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी आतापर्यंतच्या पर्जन्यमानाची स्थिती पाहता सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाची सरासरी गाठली जाणार की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसाची तुलना केल्यास केवळ चार तालुक्यांनी ही सरासरी गाठल्याचे दिसत असून आठ तालुके अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १२५.६ टक्के आहे. त्या खालोखाल १४२३.९ मिमी पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे पडणाºया पावसाचे प्रमाण पाहता पडलेला पाऊस १०७ टक्के आहे.सरासरी पडणाºया पावसाच्या तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १३८.९ टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. प्रत्यक्षात तिथे झालेला पाऊस १३६४.९ मिमी आहे. याशिवाय मुलचेरा तालुक्यातही सरासरीच्या आसपास म्हणजे ९८.२ टक्के पाऊस झाला. या तालुक्यात प्रत्यक्षात पडलेला पाऊस १०९२.७ मिमी आहे.सध्या धानपीक गर्भात असून पिकाला पावसाची गरज आहे. पण गेल्या १० ते १५ दिवसांपासून तुरळक प्रमाणात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. सर्वसमावेशक पाऊस न झाल्यास अनेक ठिकाणी धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या तालुक्यात पावसाची गरजजिल्ह्यात सर्वात कमी पावसाचे प्रमाण गडचिरोली (६४.२ टक्के), देसाईगंज (६५.२), धानोरा (६६.७), कोरची (७३.८), आरमोरी (७८.८), कुरखेडा (८५.१), चामोर्शी (८६.७) आणि एटापल्ली (९०.५) या आठ तालुक्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या सुरूवातीपासून हे प्रमाण असेच कायम असल्यामुळे उरलेल्या मोजक्या दिवसात पावसाची कमतरता भरून निघण्याची शक्यता नाही. 

टॅग्स :Rainपाऊस