शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आठ भरमार बंदुका केल्या पाेलिसांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 16:44 IST

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांचे नक्षल सप्ताहात पोलिसांना सहकार्य

गडचिराेली : दिनांक २ ते ८ डिसेंबर या कालावधीत होणा­ऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहदरम्यान पाेलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. अहेरी तालुक्यातील पेरमिली हद्दीतील नागरिकांनी ८ भरमार बंदुका व १ बॅरल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशाच प्रकारच्या वडिलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत.

दुर्गम, अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबींचा फायदा घेऊन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, कुमार चिंता, यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलिस स्टेशन येथे स्वाधीन कराव्यात, असे आवाहन पाेलिसांनी केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पेरमिली हद्दीतील गट्टेपल्ली, रापल्ले, येरमनार, येरमनार टोला, चंद्रा व कुडकेली गावांतील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या ८ भरमार बंदुका व १ बॅरल दिनांक ५ डिसेंबर रोजी अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या समक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अहेरी येथे स्वाधीन केल्या.

स्वेच्छेने बंदुका स्वाधीन करणाऱ्यांचा अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासाठी उपपाेलिस स्टेशनचे पेरमिलीचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य जाधव, नाइक पाेलिस शिपाई केशव गुरनुले, पाेलिस शिपाई राहुल खारडे, ब्रिजेश सिडाम, राकेश उरवेते, पंकज दंडिकवार, सुरज करपेत यांनी सहकार्य केले.

इतरांनाही प्रोत्साहित करणार

ज्या काळात बंदुका खरेदी करण्यात आल्या, त्या काळात त्यांची गरज हाेती. आता मात्र कायद्याचे राज्य आले आहे. वन्यजिवांच्या शिकारीवरही बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे भरमार बंदुकांचा उद्देशच संपला आहे. या बंदुकांंसाठी नक्षलवादी दबाव टाकू शकतात. त्यामुळे या बंदुका पाेलिसांकडे परत कराव्यात, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांनी केल्यानंतर ज्यांच्याकडे बंदुका आहेत, त्यांना परत करण्यासाठी सांगू, असे आश्वासन नागरिकांनी दिले.

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिसGadchiroliगडचिरोली