शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

वैनगंगेची धार आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:34 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे या नदीवरील पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीला गडचिरोली जिल्ह्याची जलवाहिणी म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना अडचणीत : चिचडोह बॅरेज व गोसेखुर्दने अडविले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे या नदीवरील पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे.गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीला गडचिरोली जिल्ह्याची जलवाहिणी म्हणून ओळखले जाते. गोसेखुर्द धरण होण्यापूर्वी सदर नदीची धार मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत ओसंडून वाहत होती. मात्र गोसेखुर्द धरण झाल्यानंतर वैनगंगा नदीचा पाण्याचा मुख्य प्रवाहच बंद झाला. तेव्हापासून वैनगंगा नदी कोरडी पडायला लागली. त्यातच आता चामोर्शीजवळ चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले. याही बॅरेजमध्ये पाणी अडविले जात आहे. चामोर्शीच्या पुढे वैनगंगा नदी पाण्याने भरली असली तरी चामोर्शी नंतर मात्र नदी पात्र कोरडे पडत चालले आहे.अनेक शेतकऱ्यांनी वैनगंगा नदीवर कृषीपंप लावून शेत फुलविले होते. आता मात्र नदी आटल्याने सिंचनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणी मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी उन्हाळ्याची शेती सुध्दा करणे सोडून दिले आहे. ज्याप्रमाणे चिचडोह बॅरेजचे बांधकाम करण्यात आले, त्याच पध्दतीने चिचडोह बॅरेजपासून काही दूर अंतरावर पुन्हा एक बॅरेजची निर्मिती होणे आवश्यक आहे. अन्यथा चामोर्शी पलिकडच्या गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना उन्हाळ्यात करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :riverनदी