शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

असमतोल पावसाने धान रोवण्या लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 22:11 IST

यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना प्रतीक्षा : केवळ पाच टक्के रोवणीची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही. ज्यांचे पऱ्हे रोवण्याजोगे झाले आहेत, आता पावसाने उसंत दिल्याने धानाची रोवणी करणे अशक्य झाले आहे. आतापर्यंत केवळ पाच टक्के क्षेत्रावरच रोवण्या आटोपल्या आहेत.यावर्षी पाऊस उशीरा आला. जेव्हापासून पावसाला सुरूवात झाली, तेव्हापासून सातत्याने पाऊस पडत होता. पावसात पेरण्या करणे शक्य होत नाही. सोयाबिन, कापूस, पिकासह धानाचे पऱ्हे टाकण्यासही विलंब झाला. काही शेतकऱ्यांनी तर अजूनपर्यंत पऱ्हेच टाकले नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता जून महिन्यातच धानाचे पऱ्हे टाकले. त्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरू होताच रोवणीच्या कामाला सुरूवात केली. मोठ्या प्रमाणात मजूर मिळत असल्याने त्यांची रोवणी आटोपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांचे धानाचे पऱ्हे टाकण्यास विलंब झाला. सतत पाऊस पडत असतानाही काही शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. त्यांचे पऱ्हे आता रोवणीजोगे झाले आहेत. मात्र पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने धानाच्या बांध्यांमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. जोपर्यंत मोठा पाऊस येणार नाही, तोपर्यंत धानाची रोवणी सुरू होणार नाही.मागील वर्षी वेळेत पाऊस पडला होता. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकणे व रोवण्याची कामे अगदी वेळेत सुरू झाली होती. मागील वर्षी जुलै महिन्यातच रोवण्यांना सुरूवात झाली होती. वेळेवर रोवण्या झाल्याने उत्पादनही चांगले झाले होते. यावर्षी मात्र रोवणी लांबणार असल्याने धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेवटी पाऊस न पडल्यास धान पीक करपण्याची शक्यता असल्याने शेतकºयांनी कमी व मध्यम कालावधीत येणाऱ्या धानाची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे.आवत्या पद्धतीने धान लागवडीवर भरआवत्या पध्दतीने धानाची लागवड केल्यास उत्पादन कमी होते. मात्र उत्पादन खर्च सुध्दा कमी आहे. यावर्षी पाऊस विलंबाने पडला. त्यामुळे रोवण्या लांबल्या आहेत. धान परिपक्व होण्याच्या शेवटच्या कालावधीत पाऊस न झाल्यास धानपीक करपण्याची शक्यता राहते. त्यामुळे परिपक्व होण्याच्या मार्गावर असलेले धानपीक करपल्यास शेतकऱ्याचे पूर्ण उत्पन्न बुडते. उलट तोट्याचा सामना करावा लागतो. याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी आवत्या पध्दतीने धान लागवड करण्यास विशेष भर दिला आहे. विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात आवत्या टाकले आहेत.जलसाठे कोरडेचअजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तलाव व इतर जलसाठे अजुनही कोरडेच आहेत. धान पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. पाऊस न झाल्यास धानपीक करपण्याची भिती आहे. विहिरींनाही अजूनपर्यंत पुरेसे पाणी आले नाही.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती