शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

असमतोल पावसाने धान रोवण्या लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 22:11 IST

यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना प्रतीक्षा : केवळ पाच टक्के रोवणीची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही. ज्यांचे पऱ्हे रोवण्याजोगे झाले आहेत, आता पावसाने उसंत दिल्याने धानाची रोवणी करणे अशक्य झाले आहे. आतापर्यंत केवळ पाच टक्के क्षेत्रावरच रोवण्या आटोपल्या आहेत.यावर्षी पाऊस उशीरा आला. जेव्हापासून पावसाला सुरूवात झाली, तेव्हापासून सातत्याने पाऊस पडत होता. पावसात पेरण्या करणे शक्य होत नाही. सोयाबिन, कापूस, पिकासह धानाचे पऱ्हे टाकण्यासही विलंब झाला. काही शेतकऱ्यांनी तर अजूनपर्यंत पऱ्हेच टाकले नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता जून महिन्यातच धानाचे पऱ्हे टाकले. त्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरू होताच रोवणीच्या कामाला सुरूवात केली. मोठ्या प्रमाणात मजूर मिळत असल्याने त्यांची रोवणी आटोपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांचे धानाचे पऱ्हे टाकण्यास विलंब झाला. सतत पाऊस पडत असतानाही काही शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. त्यांचे पऱ्हे आता रोवणीजोगे झाले आहेत. मात्र पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने धानाच्या बांध्यांमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. जोपर्यंत मोठा पाऊस येणार नाही, तोपर्यंत धानाची रोवणी सुरू होणार नाही.मागील वर्षी वेळेत पाऊस पडला होता. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकणे व रोवण्याची कामे अगदी वेळेत सुरू झाली होती. मागील वर्षी जुलै महिन्यातच रोवण्यांना सुरूवात झाली होती. वेळेवर रोवण्या झाल्याने उत्पादनही चांगले झाले होते. यावर्षी मात्र रोवणी लांबणार असल्याने धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेवटी पाऊस न पडल्यास धान पीक करपण्याची शक्यता असल्याने शेतकºयांनी कमी व मध्यम कालावधीत येणाऱ्या धानाची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे.आवत्या पद्धतीने धान लागवडीवर भरआवत्या पध्दतीने धानाची लागवड केल्यास उत्पादन कमी होते. मात्र उत्पादन खर्च सुध्दा कमी आहे. यावर्षी पाऊस विलंबाने पडला. त्यामुळे रोवण्या लांबल्या आहेत. धान परिपक्व होण्याच्या शेवटच्या कालावधीत पाऊस न झाल्यास धानपीक करपण्याची शक्यता राहते. त्यामुळे परिपक्व होण्याच्या मार्गावर असलेले धानपीक करपल्यास शेतकऱ्याचे पूर्ण उत्पन्न बुडते. उलट तोट्याचा सामना करावा लागतो. याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी आवत्या पध्दतीने धान लागवड करण्यास विशेष भर दिला आहे. विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात आवत्या टाकले आहेत.जलसाठे कोरडेचअजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तलाव व इतर जलसाठे अजुनही कोरडेच आहेत. धान पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. पाऊस न झाल्यास धानपीक करपण्याची भिती आहे. विहिरींनाही अजूनपर्यंत पुरेसे पाणी आले नाही.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती