शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

पावसामुळे भाकरोंडी-भान्सी मार्ग खचला

By admin | Updated: October 9, 2014 23:01 IST

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे खोलगट भागातील पाण्याचा प्रवाह वाढून आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा परिसरातील भाकरोंडी-भान्सी मार्ग काही प्रमाणात वाहून गेला.

जोगीसाखरा : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे खोलगट भागातील पाण्याचा प्रवाह वाढून आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा परिसरातील भाकरोंडी-भान्सी मार्ग काही प्रमाणात वाहून गेला. संततधार पावसामुळे या मार्गावर भलामोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक डांबरीकरण व कच्च्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक मार्गाची दूर्दशा झाली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. संततधार पावसामुळे भाकरोंडी ते भान्सी दरम्यानच्या मार्गावर देवखडकी गावाजवळ खड्डा पडला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या संरक्षण भिंतीलाही मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने भाकरोंडी-भान्सी मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी भाकरोंडी व भान्सी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दूरवस्था झालेल्या भाकरोंडी-भान्सी मार्गासह अन्य मार्गाची दूरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोगीसाखरा परिसरातील नागरिकांनी अनेकदा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे केली. अनेकदा निवेदनही दिले. मात्र गावकऱ्यांच्या मागणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. (वार्ताहर)