शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

पावसाअभावी शेतजमिनीला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच्या शेतीवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाचे सावट झाले गडद : विदारक दृश्य पाहून पाणावताहेत शेतकऱ्यांचे डोळे

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/चामोर्शी : जुलै महिन्यात देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. जोरदार पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडत असून रोवणी झालेले शेतजमिनीला भेगा पडत आहेत. हे विदारक दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच्या शेतीवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांचे बजेट यावर्षी कोलमडले आहे. पीक कर्ज व खासगी बँकांकडून कर्ज घेऊन पीक लागवडीचा आतापर्यंतचा खर्च बºयाच शेतकºयांनी केला आहे. या दोन्ही तालुक्यात धानपीक रोवणीचे काम ४० टक्क्याच्या आत आहे. रोवणी झालेल्या शेताला सुद्धा पाणी नसल्याने हे पीक धोक्यात आले आहे. शेतातील बांध्या पूर्णत: कोरड्या झाल्या असून काही ठिकाणच्या शेतजमिनीला भेगा पडत आहे. छोटी-मोठी सिंचन सुविधा असलेले शेतकरी मोटारपंप व विहिरीच्या माध्यमातून शेताला पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र पावसाळ्याच्या सुरूवातीपासूूनच कृत्रिम पाणीपुरवठा करावा लागत असल्याने यावरील विद्युत बिल व इंधनाचा खर्च शेतकºयांच्या माथी पडणार आहे. परिणामी यावर्षीची धानाची शेती पूर्ण तोट्याची होणार आहे.देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी नहरामार्फत शेतजमिनीला सोडण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातही रेगडी येथील कन्नमवार धरणाचे पाणी नहराद्वारे सोडण्यात आले आहे.रोवणीसाठी सोडले रेगडी धरणाचे पाणीपाऊस बरसत नसल्याने चामोर्शी तालुक्यातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहे. दरम्यान ही बाब बºयाच शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आमदारांनी रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी नहरामार्फत सोडण्यासंदर्भात शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर १ जुलै रोजी आ.डॉ.देवराव होळी यांच्या उपस्थितीत जलपूजन करून दिना धरणाचे पाणी सोडण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय गंगथडे, कार्यकारी अभियंता मेश्राम, तालुका अभियंता घोलपे उपस्थित होते. दिना धरणाच्या मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने काही शेतकऱ्याचे रोवणीचे काम सुरू झाले आहे. मात्र उपकालव्याला पाणी न सोडल्याने चामोर्शीलगतच्या शेतातील रोवणीचे काम अजूनही ठप्प पडले आहे. उपकालव्याला पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी