शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतजमिनीला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच्या शेतीवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाचे सावट झाले गडद : विदारक दृश्य पाहून पाणावताहेत शेतकऱ्यांचे डोळे

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/चामोर्शी : जुलै महिन्यात देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. जोरदार पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडत असून रोवणी झालेले शेतजमिनीला भेगा पडत आहेत. हे विदारक दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच्या शेतीवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांचे बजेट यावर्षी कोलमडले आहे. पीक कर्ज व खासगी बँकांकडून कर्ज घेऊन पीक लागवडीचा आतापर्यंतचा खर्च बºयाच शेतकºयांनी केला आहे. या दोन्ही तालुक्यात धानपीक रोवणीचे काम ४० टक्क्याच्या आत आहे. रोवणी झालेल्या शेताला सुद्धा पाणी नसल्याने हे पीक धोक्यात आले आहे. शेतातील बांध्या पूर्णत: कोरड्या झाल्या असून काही ठिकाणच्या शेतजमिनीला भेगा पडत आहे. छोटी-मोठी सिंचन सुविधा असलेले शेतकरी मोटारपंप व विहिरीच्या माध्यमातून शेताला पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र पावसाळ्याच्या सुरूवातीपासूूनच कृत्रिम पाणीपुरवठा करावा लागत असल्याने यावरील विद्युत बिल व इंधनाचा खर्च शेतकºयांच्या माथी पडणार आहे. परिणामी यावर्षीची धानाची शेती पूर्ण तोट्याची होणार आहे.देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी नहरामार्फत शेतजमिनीला सोडण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातही रेगडी येथील कन्नमवार धरणाचे पाणी नहराद्वारे सोडण्यात आले आहे.रोवणीसाठी सोडले रेगडी धरणाचे पाणीपाऊस बरसत नसल्याने चामोर्शी तालुक्यातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहे. दरम्यान ही बाब बºयाच शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आमदारांनी रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी नहरामार्फत सोडण्यासंदर्भात शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर १ जुलै रोजी आ.डॉ.देवराव होळी यांच्या उपस्थितीत जलपूजन करून दिना धरणाचे पाणी सोडण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय गंगथडे, कार्यकारी अभियंता मेश्राम, तालुका अभियंता घोलपे उपस्थित होते. दिना धरणाच्या मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने काही शेतकऱ्याचे रोवणीचे काम सुरू झाले आहे. मात्र उपकालव्याला पाणी न सोडल्याने चामोर्शीलगतच्या शेतातील रोवणीचे काम अजूनही ठप्प पडले आहे. उपकालव्याला पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी