शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

धानपिकाच्या रोवणीअभावी शेतजमिनी झाल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवणी न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची गडद सावली पसरली आहे. शेतातील बांध्यांमध्ये गवतच गवत वाढले आहे.

ठळक मुद्देपावसाच्या दडीमुळे बिकट परिस्थिती : दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्याने पºहे जाणार वाया

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : धानपीकाच्या रोवणीसाठी योग्य प्रमाणात पाऊसच पडत नसल्यामुळे कोरड्या पडलेल्या शेतातील धानाचे वाफे करपने सुरू झाले आहे. काही शेतातील धानाचे पऱ्हे पेरणीपासून दीड महिना उलटल्याने गुडघाभर वाढले आहेत. आता रोवणीचा कालावधी निघून जात असल्याने विसोरा परिसरासह अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवणी न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची गडद सावली पसरली आहे. शेतातील बांध्यांमध्ये गवतच गवत वाढले आहे. आता पाऊस आल्यावर रोवणीची कामे केली तरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील १९ जुलैला पावसाचे तीन नक्षत्र संपून पुष्य हे चौथे नक्षत्र सुरू झाले. मात्र याही नक्षत्राने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. पुष्य नक्षत्रात तीन-चार दिवस हलक्या-मध्यम पावसाच्या मोजक्याच सरी कोसळल्या. या पाण्याने करपलेल्या वा करपत चाललेल्या वाफ्यांना नवजीवन मिळाले. परंतु वरटेकरी, वरपावसाच्या शेतातील धान पीक रोवणीची कामे अजूनही सुरू होऊ शकलेली नाहीत.यंदा पावसाला जोर नसल्याने जमिनीवर पडलेले पाणी, पाऊस बंद होताच उष्णतेच्या तीव्रतेने जिरून जात आहे. पाऊस पडून रोवणीसाठी चिखलणी सुरू होईल असे पाणी बांध्यांमध्ये साचत नसल्याने रोवणीयोग्य वाफ्यांना ५० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जमीन मुरमाड व उंच भागावर असेल अशा शेतातील वाफे करपले, तर ज्या जमिनीत ओलावा टिकून आहे त्या शेतातील धान वाफे गुडघाभर वाढले. कसारी, डोंगरमेंढा, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या गावशिवारातील शेकडो हेक्टर शेतजमिनी रोवणीशिवाय रिकाम्या आहेत.रोवणी पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळकाही शेतकरी रोवणी करण्यासाठी शेतातील किंवा शेताजवळच्या जलसाठयातून मोटारपंप, होंडा पंप पाईपद्वारे दूरवरून शेतात पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवस-रात्र मेहनत करून रोवणी पूर्ण झाली पाहिजे यासाठी मेहनत घेत आहेत. दुसरीकडे रोवणी झालेल्या पिकांनाही आता पाऊस गायब होऊन उष्णता वाढत असल्याने पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे एकाच वेळेस विजेचा वापर वाढत आहे. याचा परिणाम घरगुती वापराच्या विजेवर होत आहे. दिवसातून २०-२५ वेळा वीजप्रवाह बंद-चालू होतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे.देसाईगंज तालुक्यात ३५ टक्के पीक धोक्यातदेसाईगंज तालुक्यात सोमवारपर्यंत ४२ टक्के पाऊस पडला आहे. देसाईगंज महसूल मंडळात ६३ टक्के तर शंकरपूर महसूल मंडळात ६५.९५ टक्के रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. देसाईगंज तालुक्यात एकूण ६५.१३ टक्के रोवणी आटोपली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यामुळे उर्वरित ३५ टक्के क्षेत्रावरील पीक यंदा धोक्यात आले. पाऊस लांबल्यास रोवणी झालेल्या क्षेत्रावरीलही पीक धोक्यात येऊ शकते. देसाईगंज प्रमाणेच जिल्ह्याच्या अनेक कमीअधिक प्रमाणात हिच स्थिती पहायला मिळत आहे.

टॅग्स :agricultureशेती