शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

धानपिकाच्या रोवणीअभावी शेतजमिनी झाल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवणी न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची गडद सावली पसरली आहे. शेतातील बांध्यांमध्ये गवतच गवत वाढले आहे.

ठळक मुद्देपावसाच्या दडीमुळे बिकट परिस्थिती : दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्याने पºहे जाणार वाया

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : धानपीकाच्या रोवणीसाठी योग्य प्रमाणात पाऊसच पडत नसल्यामुळे कोरड्या पडलेल्या शेतातील धानाचे वाफे करपने सुरू झाले आहे. काही शेतातील धानाचे पऱ्हे पेरणीपासून दीड महिना उलटल्याने गुडघाभर वाढले आहेत. आता रोवणीचा कालावधी निघून जात असल्याने विसोरा परिसरासह अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवणी न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची गडद सावली पसरली आहे. शेतातील बांध्यांमध्ये गवतच गवत वाढले आहे. आता पाऊस आल्यावर रोवणीची कामे केली तरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील १९ जुलैला पावसाचे तीन नक्षत्र संपून पुष्य हे चौथे नक्षत्र सुरू झाले. मात्र याही नक्षत्राने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. पुष्य नक्षत्रात तीन-चार दिवस हलक्या-मध्यम पावसाच्या मोजक्याच सरी कोसळल्या. या पाण्याने करपलेल्या वा करपत चाललेल्या वाफ्यांना नवजीवन मिळाले. परंतु वरटेकरी, वरपावसाच्या शेतातील धान पीक रोवणीची कामे अजूनही सुरू होऊ शकलेली नाहीत.यंदा पावसाला जोर नसल्याने जमिनीवर पडलेले पाणी, पाऊस बंद होताच उष्णतेच्या तीव्रतेने जिरून जात आहे. पाऊस पडून रोवणीसाठी चिखलणी सुरू होईल असे पाणी बांध्यांमध्ये साचत नसल्याने रोवणीयोग्य वाफ्यांना ५० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जमीन मुरमाड व उंच भागावर असेल अशा शेतातील वाफे करपले, तर ज्या जमिनीत ओलावा टिकून आहे त्या शेतातील धान वाफे गुडघाभर वाढले. कसारी, डोंगरमेंढा, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या गावशिवारातील शेकडो हेक्टर शेतजमिनी रोवणीशिवाय रिकाम्या आहेत.रोवणी पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळकाही शेतकरी रोवणी करण्यासाठी शेतातील किंवा शेताजवळच्या जलसाठयातून मोटारपंप, होंडा पंप पाईपद्वारे दूरवरून शेतात पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवस-रात्र मेहनत करून रोवणी पूर्ण झाली पाहिजे यासाठी मेहनत घेत आहेत. दुसरीकडे रोवणी झालेल्या पिकांनाही आता पाऊस गायब होऊन उष्णता वाढत असल्याने पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे एकाच वेळेस विजेचा वापर वाढत आहे. याचा परिणाम घरगुती वापराच्या विजेवर होत आहे. दिवसातून २०-२५ वेळा वीजप्रवाह बंद-चालू होतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे.देसाईगंज तालुक्यात ३५ टक्के पीक धोक्यातदेसाईगंज तालुक्यात सोमवारपर्यंत ४२ टक्के पाऊस पडला आहे. देसाईगंज महसूल मंडळात ६३ टक्के तर शंकरपूर महसूल मंडळात ६५.९५ टक्के रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. देसाईगंज तालुक्यात एकूण ६५.१३ टक्के रोवणी आटोपली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यामुळे उर्वरित ३५ टक्के क्षेत्रावरील पीक यंदा धोक्यात आले. पाऊस लांबल्यास रोवणी झालेल्या क्षेत्रावरीलही पीक धोक्यात येऊ शकते. देसाईगंज प्रमाणेच जिल्ह्याच्या अनेक कमीअधिक प्रमाणात हिच स्थिती पहायला मिळत आहे.

टॅग्स :agricultureशेती