शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

देवदा पुलाअभावी ४५ किमींचा होतो फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

रेगडी-देवदा हा मार्ग एटापल्ली तालुक्याला जोडला आहे. या मार्गाने एटापल्ली येथे कमी अंतरात पोहोचता येत असल्याने चामोर्शी, घोट, रेगडी परिसरातील अनेक नागरिक, कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. रेगडी व देवदा या दोन गावांमध्ये सहा किमीचे अंतर आहे. या मार्गाने वाहनांची वर्दळ राहत असल्याने दोन्ही बाजूने दिना नदीपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदिना नदीवर पूल आवश्यक : पावसाळ्यात धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : रेगडी-देवदा मार्गावर असलेल्या दिना नदीवर पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे ४० ते ४५ किमीचा फेरा करून गाव गाठावे लागते.रेगडी-देवदा हा मार्ग एटापल्ली तालुक्याला जोडला आहे. या मार्गाने एटापल्ली येथे कमी अंतरात पोहोचता येत असल्याने चामोर्शी, घोट, रेगडी परिसरातील अनेक नागरिक, कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. रेगडी व देवदा या दोन गावांमध्ये सहा किमीचे अंतर आहे. या मार्गाने वाहनांची वर्दळ राहत असल्याने दोन्ही बाजूने दिना नदीपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र नदीपात्रातून पुलाचे बांधकाम झाले नसल्याने दोन्ही बाजूचे प्रवाशी नदी किनाऱ्यावर वाहने ठेवून पाणी कमी असल्यास पायदळ प्रवास करतात. तर कधी डोंग्याने प्रवास केला जाते. या ठिकाणावरून दिना नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. त्यामुळे नदीपात्रातून पाणी असताना प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. तरीही नागरिक, कर्मचारी या मार्गाने वर्षभर प्रवास करतात.काही प्रवाशी धोकादायक प्रवास करण्याऐवजी घोट-मुलचेरा-देवदा असा प्रवास करतात. या मार्गाने गेल्यास ४० ते ४५ किमीचा फेरा पडते. त्यामुळे दिना नदीवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यात जवळपास १२५० मिमी पाऊस पडते. जवळपास आठ महिने नदीपात्रातून पाणी वाहत राहते. त्यामुळे या नदीवर पूल बांधल्याशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी पूल बांधण्यासाठी शासनाकडे अनेकवेळा मागणी केली आहे.पूल मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षरेगडी-देवदा मार्गावरून होणारी वाहतूक लक्षात घेतली तर या ठिकाणावरून पूल होणे आवश्यक आहे. पुलाअभावी नागरिक व कर्मचाऱ्यांना नदीपात्रातून पाणी असतानाही धोकादायक प्रवास करावा लागते. त्यामुळे या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्याबाबत चामोर्शी व एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधींकडे निवेदन सादर केले आहे. मात्र अजूनपर्यंत पूल बांधकामाला निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता पुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र यातून रेगडीचा पूल वगळण्यात आला आहे. पुलाची गरज लक्षात घेता या ठिकाणी पूल मंजूर करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.

टॅग्स :Rainपाऊस