शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पुरेशा बारदान्याअभावी धान शेतात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:44 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडी येथील रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ५ मे २०१८ रोजी सुरू झाले. तेव्हापासून महामंडळामार्फत धान खरेदीसाठी या केंद्रावर बारदाना पुरविण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांचा धान मळणी करूनही शेतात पडून आहे.

ठळक मुद्देमहामंडळाचे अधिकारी सुस्त : रबीचे धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून बारदान्याची शेतकऱ्यांकडून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडी येथील रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ५ मे २०१८ रोजी सुरू झाले. तेव्हापासून महामंडळामार्फत धान खरेदीसाठी या केंद्रावर बारदाना पुरविण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान मळणी करूनही शेतात पडून आहे.आदिवासी विकास महामंडळाचे देलनवाडी येथील धान खरेदी केंद्र जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आहे. केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रावर शेतकरी विक्रीसाठी धान आणत आहेत. मागील खरीप हंगामातील बारदाना शिल्लक होता. या बारदान्याच्या भरवशावर आतापर्यंत खरेदी करण्यात आली, असे संस्थेचे व्यवस्थापक घोडमारे यांनी सांगितले. त्यानंतर आपण वरिष्ठांकडे बारदाना पुरविण्याबाबत मागणी केली आहे. सध्या मागील चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन अवकाळी वादळी पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापकाने तत्काळ बारदान्याची मागणी करावी व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बारदान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी मानापूर, देलनवाडी येथील शेतकरी रामहरी चौधरी, भाईचंद गुरनुले, तेजराव लाखनकर, सुधाकर मेश्राम, हरबाजी घोडमारे, जीवन दडमल, व्यंकट चौधरी आदींनी केली आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत उन्हाळी धान पिकासाठी आरमोरी, कुरखेडा, कोरची या तीन तालुक्यात प्रामुख्याने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वी सदर केंद्रावर मागील हंगामातील किती बारदाना शिल्लक आहे व सध्याच्या हंगामात किती बारदान्याची आवश्यकता आहे.सध्या आदिवासी विकास महामंडळाकडे ९५८ इतका बारदाना आहे. एवढा अल्प बारदाना पुरविणे सोयीचे होणार नाही म्हणून आम्ही तत्काळ २५ बारदान्यांची महामंडळाकडे मागणी केली आहे. प्रादेशिक व्यवस्थापक महत्वाच्या बैठकीसाठी बाहेर आहे. त्यांची मंजुरी मिळाल्याबरोबर देलनवाडी धान खरेदी केंद्राला बारदाना पुरविला जाईल. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ देणार नाही.- एस. एल. राजुरे,उप्रपादेशिक व्यवस्थापक,आदिवासी विकास महामंडळ कार्यालय आरमोरी

टॅग्स :Farmerशेतकरी