शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

पुरेशा बारदान्याअभावी धान शेतात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:44 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडी येथील रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ५ मे २०१८ रोजी सुरू झाले. तेव्हापासून महामंडळामार्फत धान खरेदीसाठी या केंद्रावर बारदाना पुरविण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांचा धान मळणी करूनही शेतात पडून आहे.

ठळक मुद्देमहामंडळाचे अधिकारी सुस्त : रबीचे धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून बारदान्याची शेतकऱ्यांकडून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडी येथील रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ५ मे २०१८ रोजी सुरू झाले. तेव्हापासून महामंडळामार्फत धान खरेदीसाठी या केंद्रावर बारदाना पुरविण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान मळणी करूनही शेतात पडून आहे.आदिवासी विकास महामंडळाचे देलनवाडी येथील धान खरेदी केंद्र जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आहे. केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रावर शेतकरी विक्रीसाठी धान आणत आहेत. मागील खरीप हंगामातील बारदाना शिल्लक होता. या बारदान्याच्या भरवशावर आतापर्यंत खरेदी करण्यात आली, असे संस्थेचे व्यवस्थापक घोडमारे यांनी सांगितले. त्यानंतर आपण वरिष्ठांकडे बारदाना पुरविण्याबाबत मागणी केली आहे. सध्या मागील चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन अवकाळी वादळी पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापकाने तत्काळ बारदान्याची मागणी करावी व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बारदान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी मानापूर, देलनवाडी येथील शेतकरी रामहरी चौधरी, भाईचंद गुरनुले, तेजराव लाखनकर, सुधाकर मेश्राम, हरबाजी घोडमारे, जीवन दडमल, व्यंकट चौधरी आदींनी केली आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत उन्हाळी धान पिकासाठी आरमोरी, कुरखेडा, कोरची या तीन तालुक्यात प्रामुख्याने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वी सदर केंद्रावर मागील हंगामातील किती बारदाना शिल्लक आहे व सध्याच्या हंगामात किती बारदान्याची आवश्यकता आहे.सध्या आदिवासी विकास महामंडळाकडे ९५८ इतका बारदाना आहे. एवढा अल्प बारदाना पुरविणे सोयीचे होणार नाही म्हणून आम्ही तत्काळ २५ बारदान्यांची महामंडळाकडे मागणी केली आहे. प्रादेशिक व्यवस्थापक महत्वाच्या बैठकीसाठी बाहेर आहे. त्यांची मंजुरी मिळाल्याबरोबर देलनवाडी धान खरेदी केंद्राला बारदाना पुरविला जाईल. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ देणार नाही.- एस. एल. राजुरे,उप्रपादेशिक व्यवस्थापक,आदिवासी विकास महामंडळ कार्यालय आरमोरी

टॅग्स :Farmerशेतकरी