शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा बारदान्याअभावी धान शेतात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:44 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडी येथील रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ५ मे २०१८ रोजी सुरू झाले. तेव्हापासून महामंडळामार्फत धान खरेदीसाठी या केंद्रावर बारदाना पुरविण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांचा धान मळणी करूनही शेतात पडून आहे.

ठळक मुद्देमहामंडळाचे अधिकारी सुस्त : रबीचे धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून बारदान्याची शेतकऱ्यांकडून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडी येथील रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ५ मे २०१८ रोजी सुरू झाले. तेव्हापासून महामंडळामार्फत धान खरेदीसाठी या केंद्रावर बारदाना पुरविण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान मळणी करूनही शेतात पडून आहे.आदिवासी विकास महामंडळाचे देलनवाडी येथील धान खरेदी केंद्र जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आहे. केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रावर शेतकरी विक्रीसाठी धान आणत आहेत. मागील खरीप हंगामातील बारदाना शिल्लक होता. या बारदान्याच्या भरवशावर आतापर्यंत खरेदी करण्यात आली, असे संस्थेचे व्यवस्थापक घोडमारे यांनी सांगितले. त्यानंतर आपण वरिष्ठांकडे बारदाना पुरविण्याबाबत मागणी केली आहे. सध्या मागील चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन अवकाळी वादळी पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापकाने तत्काळ बारदान्याची मागणी करावी व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बारदान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी मानापूर, देलनवाडी येथील शेतकरी रामहरी चौधरी, भाईचंद गुरनुले, तेजराव लाखनकर, सुधाकर मेश्राम, हरबाजी घोडमारे, जीवन दडमल, व्यंकट चौधरी आदींनी केली आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत उन्हाळी धान पिकासाठी आरमोरी, कुरखेडा, कोरची या तीन तालुक्यात प्रामुख्याने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वी सदर केंद्रावर मागील हंगामातील किती बारदाना शिल्लक आहे व सध्याच्या हंगामात किती बारदान्याची आवश्यकता आहे.सध्या आदिवासी विकास महामंडळाकडे ९५८ इतका बारदाना आहे. एवढा अल्प बारदाना पुरविणे सोयीचे होणार नाही म्हणून आम्ही तत्काळ २५ बारदान्यांची महामंडळाकडे मागणी केली आहे. प्रादेशिक व्यवस्थापक महत्वाच्या बैठकीसाठी बाहेर आहे. त्यांची मंजुरी मिळाल्याबरोबर देलनवाडी धान खरेदी केंद्राला बारदाना पुरविला जाईल. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ देणार नाही.- एस. एल. राजुरे,उप्रपादेशिक व्यवस्थापक,आदिवासी विकास महामंडळ कार्यालय आरमोरी

टॅग्स :Farmerशेतकरी