शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:34 IST

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देआत्माचा पुढाकार : नैनपूर येथील शेतकऱ्यांचा धान पिकाच्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग

विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून देसाईगंज तालुक्याच्या नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरत एकात्मिक तण व कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतीत केला आहे. या गटातील शेतकरी तण व कीड नियंत्रणासाठी बदकाचा वापर करीत आहेत.आत्मा अंतर्गत नैनपूर येथे भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गट स्थापन करण्यात आला. या गटात एकूण २० शेतकरी सहभागी आहेत. या शेतकऱ्यांनी ४० एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका तंत्र व्यवस्थापक महेश दोनाडकर कृषी सहायक कल्पना ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे. बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. कोणत्याही तापमानात बदक सहज टिकतो. कीड व कीटक हे बदकांचे प्रमुख खाद्य आहे. कोरीया, जपान, थायलंड या देशात राईस डग फार्मिंग करताना बदकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच धर्तीवर आत्माच्या मार्गदर्शनात सेंद्रीय शेती करीत असलेल्या नैनपूर येथील शेतकºयांकडून धान शेतीतील तण व कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर सुरू आहे. भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गटाने २० बदकाची शेती केली असून त्याचे व्यवस्थापन व पोषण करण्याची जबाबदारी गटाचे सचिव शंकर भाजीपाले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत या बदका धान पिकाच्या शेतीत सोडल्या जातात. धानाच्या खोडामध्ये सिलिका असल्याने हे बदक धान पीक न खाता धान पिकातील तण, खोडकिडे, तुडतुडे खातात. पिकावरील व चिखलातील कीडे खातात. यामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.विसोरा गावाजवळ जिल्ह्यातील एकमेव बदक पैदास केंद्र आहे. जनावराला होणाऱ्या फिनस रोगाचे निर्मूलन करण्यासाठी व शेतकºयांना बदकांची पिले पुरविण्याकरिता विसोरा गावाजवळ बदक पैदास केंद्राची स्थापना करण्यात आली. येथून शेतकरी बदक नेत आहेत.सेंद्रिय धान शेतीत बदक वापरल्याने सेंद्रिय शेतीची चाचणी कीड व तण निर्मुलन होते. तसेच यामुळे बदकांपासून धानाच्या उत्पादनात वाढ होते. तसेच पर्यावरण संतुलन व रक्षणाच्या दृष्टीने धान शेतीत बदकांचा वापर करणे हितकारक आहे. नैनपूर येथील शेतकऱ्यांनी बदकांचा प्रयोग सुरू केला आहे.- डॉ. प्रकाश पवार,प्रकल्प संचालक,आत्मा गडचिरोलीबदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. बदकाचा वापर खाण्यासाठी व अंडीसाठी होतो. बदकांचा वापर तण व किड निर्मुलनासाठी केल्यास शेतकºयांना जास्त फायदेशीर ठरु शकते. बदक पैदास प्रक्षेत्रात हॅचरीची सुविधा असल्याने शेतकºयांनी बदकांची मागणी केल्यास स्वस्त दरात बदक पिल्ले उपलब्ध करुन देता येईल.- डॉ. पी.जी.सुकारे,पशुधन विकास अधिकारी,बदक पैदास प्रक्षेत्र वडसा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती