शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:34 IST

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देआत्माचा पुढाकार : नैनपूर येथील शेतकऱ्यांचा धान पिकाच्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग

विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून देसाईगंज तालुक्याच्या नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरत एकात्मिक तण व कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतीत केला आहे. या गटातील शेतकरी तण व कीड नियंत्रणासाठी बदकाचा वापर करीत आहेत.आत्मा अंतर्गत नैनपूर येथे भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गट स्थापन करण्यात आला. या गटात एकूण २० शेतकरी सहभागी आहेत. या शेतकऱ्यांनी ४० एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका तंत्र व्यवस्थापक महेश दोनाडकर कृषी सहायक कल्पना ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे. बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. कोणत्याही तापमानात बदक सहज टिकतो. कीड व कीटक हे बदकांचे प्रमुख खाद्य आहे. कोरीया, जपान, थायलंड या देशात राईस डग फार्मिंग करताना बदकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच धर्तीवर आत्माच्या मार्गदर्शनात सेंद्रीय शेती करीत असलेल्या नैनपूर येथील शेतकºयांकडून धान शेतीतील तण व कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर सुरू आहे. भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गटाने २० बदकाची शेती केली असून त्याचे व्यवस्थापन व पोषण करण्याची जबाबदारी गटाचे सचिव शंकर भाजीपाले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत या बदका धान पिकाच्या शेतीत सोडल्या जातात. धानाच्या खोडामध्ये सिलिका असल्याने हे बदक धान पीक न खाता धान पिकातील तण, खोडकिडे, तुडतुडे खातात. पिकावरील व चिखलातील कीडे खातात. यामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.विसोरा गावाजवळ जिल्ह्यातील एकमेव बदक पैदास केंद्र आहे. जनावराला होणाऱ्या फिनस रोगाचे निर्मूलन करण्यासाठी व शेतकºयांना बदकांची पिले पुरविण्याकरिता विसोरा गावाजवळ बदक पैदास केंद्राची स्थापना करण्यात आली. येथून शेतकरी बदक नेत आहेत.सेंद्रिय धान शेतीत बदक वापरल्याने सेंद्रिय शेतीची चाचणी कीड व तण निर्मुलन होते. तसेच यामुळे बदकांपासून धानाच्या उत्पादनात वाढ होते. तसेच पर्यावरण संतुलन व रक्षणाच्या दृष्टीने धान शेतीत बदकांचा वापर करणे हितकारक आहे. नैनपूर येथील शेतकऱ्यांनी बदकांचा प्रयोग सुरू केला आहे.- डॉ. प्रकाश पवार,प्रकल्प संचालक,आत्मा गडचिरोलीबदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. बदकाचा वापर खाण्यासाठी व अंडीसाठी होतो. बदकांचा वापर तण व किड निर्मुलनासाठी केल्यास शेतकºयांना जास्त फायदेशीर ठरु शकते. बदक पैदास प्रक्षेत्रात हॅचरीची सुविधा असल्याने शेतकºयांनी बदकांची मागणी केल्यास स्वस्त दरात बदक पिल्ले उपलब्ध करुन देता येईल.- डॉ. पी.जी.सुकारे,पशुधन विकास अधिकारी,बदक पैदास प्रक्षेत्र वडसा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती