शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

भोजनाअभावी वसतिगृह बंद

By admin | Updated: July 14, 2014 23:57 IST

शाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी समाजकल्याण विभागाच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने सदर

ई-निविदेने केला घोळ : समाजकल्याण कार्यालयावर विद्यार्थी धडकले गडचिरोली : शाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी समाजकल्याण विभागाच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने सदर वसतिगृह बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण होत आहे. राज्य शासनाच्या ई-टेंडरिंगमुळे ही अडचण निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना आणखी १० दिवस भोजनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. समाजकल्याण विभागाच्या मार्फतीने जिल्ह्यात ६ वसतिगृह चालविले जात आहेत. त्यापैकी ४ वसतिगृहाची विद्यार्थी प्रवेशक्षमता प्रत्येकी १०० आहे. तर २ वसतिगृहाची प्रवेशक्षमता प्रत्येकी ७५ एवढी आहे. या ६ वसतिगृहामध्ये एकूण ५५० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यापैकी गडचिरोली येथे ३, आरमोरी, चामोर्शी व अहेरी येथे प्रत्येकी १ वसतिगृह आहे. यापूर्वी या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करणाऱ्या कंत्राटदाराची नेमणूक समाजकल्याण अधिकाऱ्याच्या मार्फतीने केली जात होती. २०१२-१३ मध्ये कंत्राटदाराची नेमणूक निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आली होती. हा कंत्राटदार २०१३-१४ या आर्थिक वर्षातही मागील वर्षीच्याच दरात विद्यार्थ्यांना भोजन उपलब्ध करून देत होता. वाढती महागाई लक्षात घेऊन भोजनाचे दर २० टक्के वाढून देण्यात यावे, अशी मागणी कंत्राटदाराने केली होती. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र शासनाने सदर प्रस्ताव नामंजूर केला. यावर्षी पहिल्यांदाच राज्यभरातील वसतिगृहांना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही प्रक्रिया नुकतीच पार पडली असून गोंदिया येथील एका कंत्राटदाराला भोजन पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष भोजन उपलब्ध होण्यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागणार आहेत.समाजकल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये आठवी ते महाविद्यालयीन वर्गाचे विद्यार्थी राहतात. शाळा सुरू झाल्याबरोबरच हे विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी आले. मात्र भोजनाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना राहण्यास समाजकल्याण विभागाच्या प्रशासनाने मनाई केली आहे. काही दिवसातच भोजनाची व्यवस्था होईल, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी आठ दिवस नातेवाईकांकडे राहून शाळेत उपस्थिती दर्शविली. मात्र १५ दिवसाचा कालावधी लोटूनही वसतिगृह उघडण्याचे चिन्ह दिसत नसल्याने १० ते १५ विद्यार्थ्यांनी थेट समाजकल्याण कार्यालय गाठून विशेष समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेतली. समाजकल्याण आयुक्त टी. डी. बरगे यांनी ई-टेंडरिंगमध्ये उशीर झाला असल्याने भोजन उपलब्ध होण्यास आणखी ८ ते १० दिवसाचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपण बाहेर जेवण करू मात्र वसतिगृहात राहू द्यावे, अशी विनंती केली. मात्र जोपर्यंत भोजनाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत राहू देणार नाही, अशी ताठर भूमिका समाजकल्याण आयुक्तांनी घेतली आहे. (नगर प्रतिनिधी)