शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

नशापान करून मतदान करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:30 IST

गडचिरोली : सध्या ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. आदर्श गाव निर्मिती करण्यासाठी गावाचा सरपंच, सदस्य निर्व्यसनी असणे गरजेचे ...

गडचिरोली : सध्या ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. आदर्श गाव निर्मिती करण्यासाठी गावाचा सरपंच, सदस्य निर्व्यसनी असणे गरजेचे आहे. अन्यथा गाव अधोगतीकडे वाटचाल करते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त करावी. नशेत बुडून अयोग्य उमेदवाराची निवड करू नका, असे आवाहन जिल्हा दारूमुक्ती संघटनेचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांदरम्यान गावागावात दारू पिणारे, पाजणारे निवडून येण्याचा प्रयत्न करतील. जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा कारभार चांगला चालण्यासाठी सरपंच व सदस्य निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. म्हणून ‘दारूमुक्त ग्रामपंचायत निवडणूक’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आदिवासी जनतेने दारूच्या आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारांची निवड करावी. अन्यथा तो उमेदवार पाच वर्षांमध्ये संपूर्ण गावाचे वाटोळे करील.

निवडणुकीदरम्यान दारूविक्री बंद असलेल्या गावातसुद्धा दारूचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनीसुद्धा निवडून येण्यासाठी दारूचे वाटप करणार नाही, असा संकल्प करावा. तसेच दारूचे आमिष देणाऱ्यांना आम्ही निवडून देणार नाही, असा निर्धार मतदारांनी करावे, असे आवाहन तोफा यांनी केले आहे.