शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गाढवी नदी आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:58 IST

गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देजलस्रोत पडताहेत कोरडे : उन्हाळ्यात जाणवणार पाण्याचे दुर्भिक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी यंदाच्या उन्हाळयात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निमाण होणार आहे.आॅगस्ट महिन्यापूर्वी आलेल्या पावसाने भरलेले पाण्याचे स्त्रोत धानाला वाचविण्यासाठी धावून आले. धान वाचले, पिकले. मात्र यामुळे नदी, नाले, तलावातील पाणीसाठा कमी झाला. आजघडीला विसोरा जवळून वाहणाऱ्या गाढवी नदीचा पाणी प्रवाह मागील दहा दिवसांपूर्वीच बंद झाला असून नदी कोरडी पडली आहे.गोंदिया जिल्ह्यातून उगम पावलेल्या गाढवी नदीवर गोठणगाव जवळ इटियाडोह येथे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन ओलीत केली जाते. गाढवी नदी आणि तिच्यावरील बांधलेले इटियाडोह धरण गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचन करण्याचे काम करते. तसेच नदीच्या किनाऱ्यावरील गावांत नदीतूनच पिण्याचे पाणी पुरविले जाते. विसोरा गावातील आणि आजूबाजूच्या पाणीसाठ्यांत पाणीपातळी कमी होत आहे. पण नदीचा पाणीप्रवाह बंद झाल्याने शेतकरी, शेतमजूर, जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होण्याची चाहूल आतापासूनच लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसºया आठवड्यापासून नदीचा पाणी प्रवाह बंद होत होत आता पूर्ण बंद होऊन नदी कोरडी झाली आहे. नदीतल्या खड्डे वा सखल भागात पाणी साचलेले दिसते मात्र ते पाणी उन्हाची तीव्रता वाढताच आटणार आहे.देसाईगंज तालुक्यातून वाहणाºया गाढवी नदीवर एकाही ठिकाणी बंधारा बांधलेला नसून शेतकरी सखल भागात खड्डा किंवा रेतीची भिंत उभी करून पाणी अडवतात. ज्या पाण्याचा वापर नदिकाठच्या शेतात पिकविल्या जाणाºया धानपीक, भाजीपाला पिकासाठी केला जातो. यंदाच्या रबी हंगामात परिसरातील नदीकाठी असलेल्या शेतात धानपीक पेरणी केली असून काहींनी मोटर पंप लावून धानरोवणी सुद्धा आटोपली आहे. पण काही शेताच्या नदीकिनारी नदी पात्रात पाणीच नाही त्यामुळे त्या शेतातील धान वाफे पाण्याविना वाळत चालले आहेत. दुसरीकडे रोवणी केलेले धानपीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. सूर्याची तीव्रता जसजशी वाढत जाईल तशीच पाण्याची पातळी कमी होत जाणार आहे. रोवणी केलेल्या शेतीला पाणी न झाल्यास धान करपून जाण्याची शक्यता आहे.गाढवी नदीचा पात्र गवत, झाडाझुडुपांनी वेढला आहे त्यातच नदीच्या पात्रात आपापल्या सोयीनुसार पाणी अडवले जाते त्यामुळे पाणी सखल भागात पाणी साचून राहल्याने या परिसरात पाणी कमी येतो. गाढवी नदीचा पाणी प्रवाह आटल्याणे गाढवी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्वांवर याचा थेट प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई