शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

गाढवी नदी आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:58 IST

गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देजलस्रोत पडताहेत कोरडे : उन्हाळ्यात जाणवणार पाण्याचे दुर्भिक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी यंदाच्या उन्हाळयात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निमाण होणार आहे.आॅगस्ट महिन्यापूर्वी आलेल्या पावसाने भरलेले पाण्याचे स्त्रोत धानाला वाचविण्यासाठी धावून आले. धान वाचले, पिकले. मात्र यामुळे नदी, नाले, तलावातील पाणीसाठा कमी झाला. आजघडीला विसोरा जवळून वाहणाऱ्या गाढवी नदीचा पाणी प्रवाह मागील दहा दिवसांपूर्वीच बंद झाला असून नदी कोरडी पडली आहे.गोंदिया जिल्ह्यातून उगम पावलेल्या गाढवी नदीवर गोठणगाव जवळ इटियाडोह येथे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन ओलीत केली जाते. गाढवी नदी आणि तिच्यावरील बांधलेले इटियाडोह धरण गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचन करण्याचे काम करते. तसेच नदीच्या किनाऱ्यावरील गावांत नदीतूनच पिण्याचे पाणी पुरविले जाते. विसोरा गावातील आणि आजूबाजूच्या पाणीसाठ्यांत पाणीपातळी कमी होत आहे. पण नदीचा पाणीप्रवाह बंद झाल्याने शेतकरी, शेतमजूर, जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होण्याची चाहूल आतापासूनच लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसºया आठवड्यापासून नदीचा पाणी प्रवाह बंद होत होत आता पूर्ण बंद होऊन नदी कोरडी झाली आहे. नदीतल्या खड्डे वा सखल भागात पाणी साचलेले दिसते मात्र ते पाणी उन्हाची तीव्रता वाढताच आटणार आहे.देसाईगंज तालुक्यातून वाहणाºया गाढवी नदीवर एकाही ठिकाणी बंधारा बांधलेला नसून शेतकरी सखल भागात खड्डा किंवा रेतीची भिंत उभी करून पाणी अडवतात. ज्या पाण्याचा वापर नदिकाठच्या शेतात पिकविल्या जाणाºया धानपीक, भाजीपाला पिकासाठी केला जातो. यंदाच्या रबी हंगामात परिसरातील नदीकाठी असलेल्या शेतात धानपीक पेरणी केली असून काहींनी मोटर पंप लावून धानरोवणी सुद्धा आटोपली आहे. पण काही शेताच्या नदीकिनारी नदी पात्रात पाणीच नाही त्यामुळे त्या शेतातील धान वाफे पाण्याविना वाळत चालले आहेत. दुसरीकडे रोवणी केलेले धानपीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. सूर्याची तीव्रता जसजशी वाढत जाईल तशीच पाण्याची पातळी कमी होत जाणार आहे. रोवणी केलेल्या शेतीला पाणी न झाल्यास धान करपून जाण्याची शक्यता आहे.गाढवी नदीचा पात्र गवत, झाडाझुडुपांनी वेढला आहे त्यातच नदीच्या पात्रात आपापल्या सोयीनुसार पाणी अडवले जाते त्यामुळे पाणी सखल भागात पाणी साचून राहल्याने या परिसरात पाणी कमी येतो. गाढवी नदीचा पाणी प्रवाह आटल्याणे गाढवी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्वांवर याचा थेट प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई