शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

गाढवी नदी आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:58 IST

गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देजलस्रोत पडताहेत कोरडे : उन्हाळ्यात जाणवणार पाण्याचे दुर्भिक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी यंदाच्या उन्हाळयात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निमाण होणार आहे.आॅगस्ट महिन्यापूर्वी आलेल्या पावसाने भरलेले पाण्याचे स्त्रोत धानाला वाचविण्यासाठी धावून आले. धान वाचले, पिकले. मात्र यामुळे नदी, नाले, तलावातील पाणीसाठा कमी झाला. आजघडीला विसोरा जवळून वाहणाऱ्या गाढवी नदीचा पाणी प्रवाह मागील दहा दिवसांपूर्वीच बंद झाला असून नदी कोरडी पडली आहे.गोंदिया जिल्ह्यातून उगम पावलेल्या गाढवी नदीवर गोठणगाव जवळ इटियाडोह येथे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन ओलीत केली जाते. गाढवी नदी आणि तिच्यावरील बांधलेले इटियाडोह धरण गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचन करण्याचे काम करते. तसेच नदीच्या किनाऱ्यावरील गावांत नदीतूनच पिण्याचे पाणी पुरविले जाते. विसोरा गावातील आणि आजूबाजूच्या पाणीसाठ्यांत पाणीपातळी कमी होत आहे. पण नदीचा पाणीप्रवाह बंद झाल्याने शेतकरी, शेतमजूर, जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होण्याची चाहूल आतापासूनच लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसºया आठवड्यापासून नदीचा पाणी प्रवाह बंद होत होत आता पूर्ण बंद होऊन नदी कोरडी झाली आहे. नदीतल्या खड्डे वा सखल भागात पाणी साचलेले दिसते मात्र ते पाणी उन्हाची तीव्रता वाढताच आटणार आहे.देसाईगंज तालुक्यातून वाहणाºया गाढवी नदीवर एकाही ठिकाणी बंधारा बांधलेला नसून शेतकरी सखल भागात खड्डा किंवा रेतीची भिंत उभी करून पाणी अडवतात. ज्या पाण्याचा वापर नदिकाठच्या शेतात पिकविल्या जाणाºया धानपीक, भाजीपाला पिकासाठी केला जातो. यंदाच्या रबी हंगामात परिसरातील नदीकाठी असलेल्या शेतात धानपीक पेरणी केली असून काहींनी मोटर पंप लावून धानरोवणी सुद्धा आटोपली आहे. पण काही शेताच्या नदीकिनारी नदी पात्रात पाणीच नाही त्यामुळे त्या शेतातील धान वाफे पाण्याविना वाळत चालले आहेत. दुसरीकडे रोवणी केलेले धानपीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. सूर्याची तीव्रता जसजशी वाढत जाईल तशीच पाण्याची पातळी कमी होत जाणार आहे. रोवणी केलेल्या शेतीला पाणी न झाल्यास धान करपून जाण्याची शक्यता आहे.गाढवी नदीचा पात्र गवत, झाडाझुडुपांनी वेढला आहे त्यातच नदीच्या पात्रात आपापल्या सोयीनुसार पाणी अडवले जाते त्यामुळे पाणी सखल भागात पाणी साचून राहल्याने या परिसरात पाणी कमी येतो. गाढवी नदीचा पाणी प्रवाह आटल्याणे गाढवी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्वांवर याचा थेट प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई