शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली हाेती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढल्यास पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती हाेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्दे३७,५७० शेतकऱ्यांनी काढला खरिपाचा विमा; मुदत वाढण्याची शक्यता

दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ३७ हजार ५७० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. विमा काढूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित विम्याची रक्कम मिळत नसल्याने प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसून येते. दरम्यान प्रिमियमच्या माध्यमातून विमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा का? असा प्रश्न जिल्ह्यातील अनेक शेतकरी करताना दिसून येत आहेत.खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली हाेती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढल्यास पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती हाेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

३०% शेतकऱ्यांची पाठ

गतवर्षी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला. नुकसान हाेऊनही विमा कंपन्यांकडून पुरेशी भरपाई मिळाली नाही. यंदा ७०% शेतकऱ्यांनी विमा काढला. ३० टक्क्यांनी पाठ फिरवली

यावर्षी आतापर्यंत केवळ सिराेंचा तालुक्यात १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

माझ्याकडे साडेतीन एकर धानाची शेती आहे. गतवर्षी आपण धान पिकाची लागवड करून खरीप पिकांचा विमा काढला. शेवटच्या टप्प्यात पाऊस आल्याने धान पिकाचे नुकसान झाले. कापणी केलेल्या धानाच्या सरड्या ओल्या झाल्या. नुकसानीच्या तुलनेत विम्याची भरपाई मिळाली नाही. शासनाने कंपनीला उचीत निर्देश देऊन बदल करणे आवश्यक आहे.- पंढरी किरंगे, शेतकरी

पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत खरीप पिकाला विमा देण्याची तरतूद आहे. मात्र कंपन्यांच्या जाचक अटीमुळे भरपाईची रक्कम फार कमी आहे. धान पीक लागवडीचा खर्च गेल्या दाेन वर्षात प्रचंड वाढला आहे. त्यातल्या त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांची नुकसान हाेत असते. नुकसानीच्या प्रमाणात विम्याचा लाभ मिळावा.- वासुदेव मडावी, शेतकरी

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा