शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

गडचिरोलीकरांना ‘पासपोर्ट’ नको, विकासाचा ‘पासवर्ड’ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:44 IST

देशातल्या ११५ अविकसित जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता विदेशवारीवर जाणाऱ्यांसाठी सरकारकडून पासपोर्ट (पारपत्र) सेवा केंद्र सुरू केले जाणार आहे. ही बातमी वाचून गडचिरोलीकरांची अवस्था हसावे की रडावे अशी झाली नाही तरच नवल.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातल्या ११५ अविकसित जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता विदेशवारीवर जाणाऱ्यांसाठी सरकारकडून पासपोर्ट (पारपत्र) सेवा केंद्र सुरू केले जाणार आहे. ही बातमी वाचून गडचिरोलीकरांची अवस्था हसावे की रडावे अशी झाली नाही तरच नवल. ज्या जिल्ह्यातल्या बहुतांश आदिवासींनी अजून उभ्या आयुष्यात जिल्ह्याच्या बाहेर पाऊल ठेवलेले नाही, जिल्ह्याचे मुख्यालय सुद्धा पाहिलेले नाही, त्यांच्यासाठी विदेशवारीची प्रक्रिया सोपी होण्याची फार मोठी सोय सरकार करणार असेल तर सरकारचे अभिनंदनच करायला पाहीजे !विकासाच्या नावावर केंद्र सरकारच्या डोक्यात काय खुळ येईल याचा अंदाज बांधणेच कठीण आहे. खरं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातून दरवर्षी विदेशवारीवर जाणारे किती लोक आहेत आणि कोणत्या निकषाच्या आधारे ही ‘महत्वपूर्ण सुविधा’ जिल्हावासियांना मिळत आहे हे माहित नाही, पण उद्या पंतप्रधानांना आपल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात बोलताना, आम्ही आदिवासी क्षेत्राचा विकास करताना काय सोयी-सुविधा दिल्या, हे सांगण्यासाठी एक मुद्दा जरून मिळणार आहे. एकदा पासपोर्ट काढल्यानंतर १० वर्ष पासपोर्ट आॅफिसची पायरी चढण्याची गरज नसते. असे असताना नवीन पासपोर्ट काढणाºया, वर्षभर विदेशवारी करणाºया किती नवीन लोकांची भर या जिल्ह्यात पडणार आहे? जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते, चांगल्या शाळांच्या सोयी नसल्यामुळे या जिल्ह्याच्या आदिवासी विद्यार्थ्यांना थेट विदेशात तर शिक्षणासाठी पाठविण्याची योजना सरकार आणणार नाही ना? जर तसे असेल तर या पासपोर्ट सेवा केंद्राचे निश्चितच स्वागत केले पाहीजे. पण गावाकडचे रस्ते, पूल कधी दुरूस्त करणार याचेही उत्तर मिळाले पाहीजे.यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या भामरागड, अहेरी, धानोरा, एटापल्ली तालुक्यात डांबरी रस्तेच नाही तर वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून दुरूस्त केलेले पूलही वाहून गेले. अधिकारी आणि कंत्राटदारांची मनमर्जी चालते. कोणाचे कोणावर नियंत्रण नाही. निर्धारित कालावधीच्या आधी रस्ता, पूल खराब झाला म्हणून कोणत्या कंत्राटदारावर कारवाई नाही की कोणता अभियंता निलंबित होत नाही. ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग सोडा, या जिल्ह्यात तर चक्क राष्टÑीय महामार्गावरच्या चिखल आणि खड्ड्यातही मालवाहू वाहने फसतात. नावाला ‘राष्टÑीय महामार्ग’ म्हटल्या जाते, पण ‘नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाडा’ अशी गत आहे. कबुल आहे की, विकास हा एका दिवसात होत नाही. पण विकासाच्या या प्रक्रियेत कोणत्या गोष्टी जास्त गरजेच्या आहेत याचे भान ठेवून त्याचा प्राधान्यक्रम ठरवल्या गेला पाहीजे.आज पासपोर्ट सेवा केंद्र आणले, उद्या कदाचित या जिल्ह्यात विमानतळ बनवले जाईल, म्हणजे जिल्ह्याची प्रगतीकडे वाटचाल सुुरू झाली असे म्हणायचे का? घरातल्या बाईला अर्धपोटी ठेवून तिला भरजरी शालू नेसवल्याने तिला खरा आनंद मिळत नाही. आधी पोटाची भूक शमवा, नंतर शौकपाणी करा. दिल्ली-मुंबई-नागपूरसारख्या शहरांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यांच्याशी गडचिरोलीची तुलना करून चालणार नाही. नागपूर-अमरावतीत मिळणारी सुविधा गडचिरोलीत दिली म्हणजे या जिल्ह्यासाठी खूप केले असे अजिबात नाही. वास्तविक त्या सुविधेची या जिल्ह्याला किती गरज आहे हे आधी तपासणे शहाणपणाचे ठरले असते. मात्र तसा शहाणपणा न दाखवता सरकार उंटावरून बसून शेळ्या हाकत असेल तर या जिल्ह्यातील आदिवासी लोक विकासाच्या समुद्रात गटांगळ्याच खात राहतील. या जिल्ह्याला पासपोर्ट केंद्राची गरजच नाही, त्यापेक्षा विकासाची दारे उघडणारा ‘पासवर्ड’ दिल्यास जिल्हावासीयांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.