शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

आरक्षण आमच्या हक्काचे... आदिवासींचा गडचिरोलीत महाक्रोश

By गेापाल लाजुरकर | Updated: October 20, 2023 17:53 IST

धनगरांचा समावेश करू नका; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आदिवासी बांधव

गडचिरोली : खऱ्या आदिवासींच्या आरक्षण सूचीमध्ये गैरआदिवासी धनगर समाजाचा समावेश करू नये या मागणीसाठी जिल्ह्यातील २५ आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात हजारो आदिवासी बांधवांनी शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात दिलेल्या विविध घोषणांनी शहरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला.

गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयातून आदिवासींच्या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चात जिल्हाभरातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘आरक्षण आमच्या हक्काचा..., आदिवासी बचाओ, संविधान बचाओ, जय सेवा, भारत माता की जय’ यासह विविध घोषणा मोर्चेकरूंनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोर्चेकरूंसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प., जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील विविध रस्ते पोलिसांनी बंद केले होते. रहदारीसाठी केवळ नवेगाव टी-पॉइंट ते सोनापूर रस्ता सुरू ठेवला होता. आंदोलनात आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, तसेच काँग्रेसचे नामदेव किरसान, विश्वजीत कोवासे, विकास कोडापे, नंदू नरोटे, डॉ. नितिन कोडवते, छगन शेडमाके, माधव गावळ, भरत येरमे, कुणाल कोवे, सैनू गोटा, सदानंद ताराम, दौलत धुर्वे, गंगाधर मडावी आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य व आदिवासीबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोर्चेकरूंच्या २६ मागण्या

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध घोषणा देऊन संयोजक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांच्या नेतृत्वात विविध २६ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी समितीचे सचिव भरत येरमे, कार्याध्यक्ष माधवराव गावळ, उपाध्यक्ष प्रशांत मडावी, सहसचिव गुलाबराव मडावी, कोषाध्यक्ष नामदेव उसेंडी, चंद्रकुमार उसेंडी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणagitationआंदोलनGadchiroliगडचिरोली