शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

वाघ व बिबट्यांच्या दहशतीने जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्यात आले. इतर उद्याेगही स्थापन हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे जंगल हे गडचिराेली जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण करत असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शेतशिवारात पाळीव जनावरे चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर वाघबिबट्यांकडून हल्ले हाेण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. मागील महिनाभराच्या कालावधीत आठ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्यात आले. इतर उद्याेगही स्थापन हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे जंगल हे गडचिराेली जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण करत असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे. अशातच आता जंगलात वाघबिबट्यांची संख्या वाढायला लागली आहे. शेतावर जात असलेल्या नागरिकांवरही वाघ व बिबट्यांचे हल्ले हाेत आहेत. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. शेतावर जाणारा रस्तासुद्धा जंगलातून जाते. मंगळवारी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा खुर्द येथील भीमदेव नागापुरे या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. बुधवारी ही घटना उघडकीस आली. गाेंडपिंपरी तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब आष्टी परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले हाेते. मनाेज तिरूपती देवावार या सात वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले तर धानाेरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावातील एका महिलेच्या घरी बिबट्या शिरला. वनविभागाने त्याला पकडून जेरबंद केले. वाघ व बिबट्यांचे हल्ले वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आठ दिवसांपासून वाघ मिळेना- नरभक्षक असलेल्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी नागझिरा येथील स्पेशल टीम बाेलाविण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून ही टीम वाघाचा शाेध घेत आहे. मात्र वाघ मिळाला नाही.

आष्टीतील बिबट्याने अखेर मुलाचा बळी घेतलाचमागील दाेन महिन्यांपासून आष्टी परिसरातील पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर आहे. काेंबड्या, शेळ्या, बकरे, कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ले करून त्यांना ठार केले. या बिबट्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत हाेती. मात्र, वन विभागाने लक्ष दिले नाही. अखेर साेमवारी पेपर काॅलनीतील एका मुलावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने यात बालक बचावला. बुधवारी पुन्हा आष्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या मार्कंडा कं. येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मुलावर हल्ला केला. त्यात बालक ठार झाला. आता तरी या बिबट्याला जेरबंद करणार काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

टॅग्स :leopardबिबट्याTigerवाघ