शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘जनता कर्फ्यू’साठी जिल्हावासीय झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.

ठळक मुद्देसाहित्य खरेदीसाठी झुंबड । सोमवारपासून राहणार जिल्हाभरातील मार्केट बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण अजून आढळलेला नाही. तरीही प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपायांना नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून सहकार्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (दि.२२) कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याकरिता ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार असून त्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत.दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधित देशातून आलेल्या कुुटुंबातील २१ व्यक्तींना गृह निगराणीत (होम क्वॉरंटाईन) करून ठेवले होते. त्यातील ९ लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संशयमुक्त करत मोकळे फिरण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे १२ जण शिल्लक होते. त्यात शनिवारी आणखी एका व्यक्तीची भर पडून ही संख्या १३ झाली. दरम्यान आतापर्यंत तपासलेल्या ४ नमुन्यांपैकी एकही कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे.दरम्यान रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.मोफत वाटले मास्क आणि साबणदेसाईगंज येथील नगरसेवक आणि व्यावसायिक गणेश फाफट यांनी सामाजिक जाणिवेतून देसाईगंज शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि डेटॉल साबणांचे वाटप केले. रविवारी बंद राहणार असल्यामुळे सोमवारी पुन्हा गरजवंत लोकांना मास्क आणि हात धुण्यासाठी डेटॉल साबण वाटप केले जाईल असे त्त्यांनी सांगितले. त्यांनी २७ वेळा रक्तदान केले आहे.ग्रामसेवकांना द्यावी लागत आहे मृतकांची माहितीग्रामीण भागातील खेडेगावांमध्ये मार्च महिन्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव, गावाचे नाव, मृत्यूचे कारण आदीसह इतर माहिती ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनाला कळवावी लागत आहे. याशिवाय संबंधित ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये बाहेरगावावरून व जिल्ह्याच्या बाहेरून कोण व्यक्ती नातेवाईक म्हणून आली, याची नोंद ग्रामसेवक ठेवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक अलर्ट झाले आहेत. यासंदर्भाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संवर्ग विकास अधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस