शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘जनता कर्फ्यू’साठी जिल्हावासीय झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.

ठळक मुद्देसाहित्य खरेदीसाठी झुंबड । सोमवारपासून राहणार जिल्हाभरातील मार्केट बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण अजून आढळलेला नाही. तरीही प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपायांना नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून सहकार्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (दि.२२) कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याकरिता ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार असून त्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत.दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधित देशातून आलेल्या कुुटुंबातील २१ व्यक्तींना गृह निगराणीत (होम क्वॉरंटाईन) करून ठेवले होते. त्यातील ९ लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संशयमुक्त करत मोकळे फिरण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे १२ जण शिल्लक होते. त्यात शनिवारी आणखी एका व्यक्तीची भर पडून ही संख्या १३ झाली. दरम्यान आतापर्यंत तपासलेल्या ४ नमुन्यांपैकी एकही कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे.दरम्यान रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.मोफत वाटले मास्क आणि साबणदेसाईगंज येथील नगरसेवक आणि व्यावसायिक गणेश फाफट यांनी सामाजिक जाणिवेतून देसाईगंज शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि डेटॉल साबणांचे वाटप केले. रविवारी बंद राहणार असल्यामुळे सोमवारी पुन्हा गरजवंत लोकांना मास्क आणि हात धुण्यासाठी डेटॉल साबण वाटप केले जाईल असे त्त्यांनी सांगितले. त्यांनी २७ वेळा रक्तदान केले आहे.ग्रामसेवकांना द्यावी लागत आहे मृतकांची माहितीग्रामीण भागातील खेडेगावांमध्ये मार्च महिन्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव, गावाचे नाव, मृत्यूचे कारण आदीसह इतर माहिती ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनाला कळवावी लागत आहे. याशिवाय संबंधित ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये बाहेरगावावरून व जिल्ह्याच्या बाहेरून कोण व्यक्ती नातेवाईक म्हणून आली, याची नोंद ग्रामसेवक ठेवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक अलर्ट झाले आहेत. यासंदर्भाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संवर्ग विकास अधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस