शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

‘जनता कर्फ्यू’साठी जिल्हावासीय झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.

ठळक मुद्देसाहित्य खरेदीसाठी झुंबड । सोमवारपासून राहणार जिल्हाभरातील मार्केट बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण अजून आढळलेला नाही. तरीही प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपायांना नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून सहकार्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (दि.२२) कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याकरिता ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार असून त्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत.दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधित देशातून आलेल्या कुुटुंबातील २१ व्यक्तींना गृह निगराणीत (होम क्वॉरंटाईन) करून ठेवले होते. त्यातील ९ लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संशयमुक्त करत मोकळे फिरण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे १२ जण शिल्लक होते. त्यात शनिवारी आणखी एका व्यक्तीची भर पडून ही संख्या १३ झाली. दरम्यान आतापर्यंत तपासलेल्या ४ नमुन्यांपैकी एकही कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे.दरम्यान रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.मोफत वाटले मास्क आणि साबणदेसाईगंज येथील नगरसेवक आणि व्यावसायिक गणेश फाफट यांनी सामाजिक जाणिवेतून देसाईगंज शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि डेटॉल साबणांचे वाटप केले. रविवारी बंद राहणार असल्यामुळे सोमवारी पुन्हा गरजवंत लोकांना मास्क आणि हात धुण्यासाठी डेटॉल साबण वाटप केले जाईल असे त्त्यांनी सांगितले. त्यांनी २७ वेळा रक्तदान केले आहे.ग्रामसेवकांना द्यावी लागत आहे मृतकांची माहितीग्रामीण भागातील खेडेगावांमध्ये मार्च महिन्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव, गावाचे नाव, मृत्यूचे कारण आदीसह इतर माहिती ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनाला कळवावी लागत आहे. याशिवाय संबंधित ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये बाहेरगावावरून व जिल्ह्याच्या बाहेरून कोण व्यक्ती नातेवाईक म्हणून आली, याची नोंद ग्रामसेवक ठेवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक अलर्ट झाले आहेत. यासंदर्भाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संवर्ग विकास अधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस