शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अखेर जिल्ह्याचे मार्केट 15 दिवसांसाठी ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारे १५ दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. आपण ही संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले. 

ठळक मुद्देकाटेकोर अंमलबजावणी करण्याचे जिल्हा टास्क फोर्सला आदेश; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक संचारबंदी पाळली जाणार आहे. त्यामुळे अनेक निर्बंधानंतरही गेले दोन दिवस गजबजून गेलेली गडचिरोलीसह जिल्हाभराची बाजारपेठ आता १५ दिवसांसाठी कुलूपबंद झाली आहे. दरम्यान, या संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्सची निर्मितीही करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश दिले.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारे १५ दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. आपण ही संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले. 

नागरिकांनी केला १५ दिवसांचा साठा१४ च्या रात्रीपासून १५ दिवस लाॅकडाऊन राहणार असल्यामुळे घराबाहेर पडता येणार नाही, या चिंतेने अनेक नागरिकांनी आवश्यक साहित्याचा साठा करून ठेवला. त्यासाठी गेल्या दाेन दिवसांपासून मार्केटमध्ये चांगलीच गर्दी उसळली हाेती. विशेष म्हणजे इतर साहित्यांसाेबत महिनाभर पुरेल एवढे किराणा सामानही नागरिकांनी घरात भरून ठेवले. वास्तविक जिवनावश्यक वस्तूमध्ये माेडणाऱ्या किराणा मालाची दुकाने लाॅकडाऊनच्या १५ दिवसांत सुरू राहणार आहेत. त्यासाठी गर्दी करण्याची गरजच नव्हती. परंतु अर्धवट माहिती आणि लाॅकडाऊन किती दिवस राहणार आणि पुढे वाढणार या भीतीने नागरिकांनी मार्केटमध्ये खरेदीसाठी घाई केल्याचे दिसून आले. 

जिल्ह्यात या अत्यावश्यक सेवा राहतील सुरू 

रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध विक्रेते, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, पशुवैद्यकीय रुग्णालय, अंडी, चिकन, मांस, तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेला कच्चा माल, गोदामे, जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, खाद्यान्न दुकाने सुरू राहतील, परंतु पानठेले सुरू ठेवता येणार नाहीत.

सार्वजनिक परिवहन रेल्वे गाड्या, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक बस, स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व (पावसाळापूर्व) कामे. स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, टेलिकॉम सेवाशी संबंधित देखभाल, दुरुस्तीची कामे, पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे, कृषी संबंधित सेवा आदी सुरू राहतील.

अधिस्वीकृत प्रसारमाध्यमे, पेट्रोलपंप, फळ विक्रेते, वकिलांची कार्यालये, विद्युत पुरवठ्याशी संबंधित कामे, इंधन गॅस पुरवठा, बँकांचे एमटीएम, पोस्टल सेवा, पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या साधनसामग्रीशी संबंधित उत्पादने, आपले सरकार केंद्र/सीसीसी/सेतू केंद्र आदी सुरू राहणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी