शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

अखेर जिल्ह्याचे मार्केट 15 दिवसांसाठी ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारे १५ दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. आपण ही संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले. 

ठळक मुद्देकाटेकोर अंमलबजावणी करण्याचे जिल्हा टास्क फोर्सला आदेश; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक संचारबंदी पाळली जाणार आहे. त्यामुळे अनेक निर्बंधानंतरही गेले दोन दिवस गजबजून गेलेली गडचिरोलीसह जिल्हाभराची बाजारपेठ आता १५ दिवसांसाठी कुलूपबंद झाली आहे. दरम्यान, या संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्सची निर्मितीही करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश दिले.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारे १५ दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. आपण ही संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले. 

नागरिकांनी केला १५ दिवसांचा साठा१४ च्या रात्रीपासून १५ दिवस लाॅकडाऊन राहणार असल्यामुळे घराबाहेर पडता येणार नाही, या चिंतेने अनेक नागरिकांनी आवश्यक साहित्याचा साठा करून ठेवला. त्यासाठी गेल्या दाेन दिवसांपासून मार्केटमध्ये चांगलीच गर्दी उसळली हाेती. विशेष म्हणजे इतर साहित्यांसाेबत महिनाभर पुरेल एवढे किराणा सामानही नागरिकांनी घरात भरून ठेवले. वास्तविक जिवनावश्यक वस्तूमध्ये माेडणाऱ्या किराणा मालाची दुकाने लाॅकडाऊनच्या १५ दिवसांत सुरू राहणार आहेत. त्यासाठी गर्दी करण्याची गरजच नव्हती. परंतु अर्धवट माहिती आणि लाॅकडाऊन किती दिवस राहणार आणि पुढे वाढणार या भीतीने नागरिकांनी मार्केटमध्ये खरेदीसाठी घाई केल्याचे दिसून आले. 

जिल्ह्यात या अत्यावश्यक सेवा राहतील सुरू 

रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध विक्रेते, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, पशुवैद्यकीय रुग्णालय, अंडी, चिकन, मांस, तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेला कच्चा माल, गोदामे, जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, खाद्यान्न दुकाने सुरू राहतील, परंतु पानठेले सुरू ठेवता येणार नाहीत.

सार्वजनिक परिवहन रेल्वे गाड्या, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक बस, स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व (पावसाळापूर्व) कामे. स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, टेलिकॉम सेवाशी संबंधित देखभाल, दुरुस्तीची कामे, पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे, कृषी संबंधित सेवा आदी सुरू राहतील.

अधिस्वीकृत प्रसारमाध्यमे, पेट्रोलपंप, फळ विक्रेते, वकिलांची कार्यालये, विद्युत पुरवठ्याशी संबंधित कामे, इंधन गॅस पुरवठा, बँकांचे एमटीएम, पोस्टल सेवा, पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या साधनसामग्रीशी संबंधित उत्पादने, आपले सरकार केंद्र/सीसीसी/सेतू केंद्र आदी सुरू राहणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी