शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

६६२ क्विंटल बियाण्यांचे अनुदानावर वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलाच्या माध्यमातून शासनाला मिळणाºया उत्पन्नातून ७ टक्के महसूल जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला जाते. या महसुलातून जिल्हा परिषद जंगलव्याप्त गाव क्षेत्रातील अल्प, अत्यल्प जमीन भूधारक, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटक्या जाती तसेच दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणांचे वितरण केले जाते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची योजना : बहुतांश पंचायत समित्यांमध्ये बियाणे वितरणाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत ५० टक्के अनुदानावर बियाणांचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेने यासाठी यावर्षी १४ लाख ९१ हजार रुपयांची तरतूद केली असून यातून सुमारे ६६२ क्विंटल धान बियाण्यांचे वितरण केले जाणार आहे. काही तालुक्यात वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलाच्या माध्यमातून शासनाला मिळणाºया उत्पन्नातून ७ टक्के महसूल जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला जाते. या महसुलातून जिल्हा परिषद जंगलव्याप्त गाव क्षेत्रातील अल्प, अत्यल्प जमीन भूधारक, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटक्या जाती तसेच दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणांचे वितरण केले जाते.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. त्यामुळे धान बियाणांची मागणी सुध्दा अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सर्वाधिक तरतूद धान बियाणांसाठी करते. यावर्षी १४ लाख ९१ हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून ६६२ क्विंटल धानाचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी बियाणे खरेदीला सुरूवात केली आहे. अनुदानावर बियाणे मिळत असल्याने पंचायत समिती गाठून बियाणांबाबत विचारपूस करीत आहेत.मिळणारे अनुदान५० टक्के अनुदानावर चार प्रकारच्या धानाचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. श्रीराम १० किलो धानाच्या बॅगसाठी शेतकºयाला ५० टक्के अनुदानांतर्गत २६० रुपये द्यावे लागणार आहेत. एमटीयू १०१० च्या २५ किलोच्या बॅगसाठी ४७५, पीकेव्ही, एचएमटी २५ किलोसाठी २६९ रुपये द्यावे लागणार आहेत.मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीया योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे सातबारा व नमुना-८-अ असणे आवश्यक आहे. हे दोन दाखले अर्जासोबत जोडल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला या योजनेंतर्गत बियाणे उपलब्ध करून दिले जातात. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध होतात. त्यामुळे बियाणांचा पुरवठा होताच शेतकºयांची पंचायत समितीमध्ये गर्दी होते. बियाण्यांसाठी अनुदानाचा निधी वाढवावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :Socialसामाजिक