शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

जिल्हा प्लास्टिक प्रदूषणमुक्त करा

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

देशभरात प्लास्टिकच्या अति वापरामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा संतुलन बिघडत चालला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी

गडचिरोली : देशभरात प्लास्टिकच्या अति वापरामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा संतुलन बिघडत चालला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हा मराठी विज्ञान परिषद गडचिरोलीच्यावतीने जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी प्लास्टिकचा समूळ नायनाट झाला पाहिजे. सध्या जिल्हाभरात प्लास्टिकचा वापर वाढला असून अविघटीत प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मुक्या जनावरांच्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याला प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावित असेही जिल्हा मराठी विज्ञान परिषदेने निवेदनात म्हटले आहे.यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी अविघटन होणाऱ्या ५० मॅकॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे मुळातच उत्पादन बंद होणे गरजेचे आहे. यासंदर्भात आपण शासनाशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देताना जिल्हा मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष संजय भांडारकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत भोंगळे, उपाध्यक्ष अनिल शेट्टे, कार्यवाह प्रशांत तम्मेवार, सहकार्यवाह तथा कोषाध्यक्ष देवेंद्र म्हशाखेत्री, गोरे, राकेश चटकुलवार, नरेंद्र उंदीरवाडे, विवेक हुलके, संजय नार्लावार, अविनाश गौरकार, राजेंद्र हिवरकर, सोनटक्के, गडपल्लीवार, पेरसिंगवार, संगनवार आदी उपस्थित होते.जिल्हा मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनाही या मागणीचे निवेदन दिले आहे. जिल्हा प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्याकरिता प्लास्टिक प्रदूषण कमी करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्निर्मिती याबाबत जनजागृती करणे, तसेच यासंदर्भात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील विविध संघटना चळवळीच्या रूपाने कार्य करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)