शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अंकिसाच्या तलावाला इकॉर्नियाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर मारून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरची, भाजीपाल्यासह विविध पिके घेतात. गावालगत दोेन तलाव असल्याने या तलावांचा दरवर्षी लिलाव स्थानिक प्रशासनामार्फत केला जातो.

ठळक मुद्देपाणी साठवणुकीवर परिणाम, मासेमारीस अडचण

n  लाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे दोन तलाव आहेत. या तलावाचा दरवर्षी लिलाव होतो. लिलावानंतर काही नागरिक मासे सोडतात. परंतु संपूर्ण तलावाला इकॉर्निया वनस्पतीने विळखा घातल्याने तलावातील पाणी साठवणुकीवर परिणाम होत आहे. शिवाय येथे मासेमारी करण्यास अडचणी येत आहेत.सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर मारून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरची, भाजीपाल्यासह विविध पिके घेतात. गावालगत दोेन तलाव असल्याने या तलावांचा दरवर्षी लिलाव स्थानिक प्रशासनामार्फत केला जातो. लिलावानंतर दरवर्षी पावसाळ्यात लिलावातून मालकी प्राप्त झालेले नागरिक येथे मत्स्यबीज टाकतात. दिवाळी व मकरसंक्रातीनंतर या मत्स्यबीजाची बऱ्यापैकी वाढ होते. वाढ झाल्यानंतर मत्स्यबीजाची विक्री करण्याकरिता संबंधित नागरिक तलावातील मासे पकडतात. परंतु या तलावाला इकॉर्निया वनस्पतीचा विळखा असल्याने मासे पकडण्यासाठी योग्य प्रकारे जाळ टाकता येत नाही. सध्या संपूर्ण तलावात इकॉर्निया वनस्पती दिसून येते. सदर वनस्पती सध्या फुलली असल्याने उठावदार दृश्य दिसून येते. असे असले तरी या वनस्पतीमुळे तलावातील जलसाठा क्षमतेवर परिणाम होत आहे.जवळपास दोन ते तीन फूट ही वनस्पती वाढते. दरवर्षी एप्रिल महिन्यात फूल येऊन त्यातील बिया खाली गळतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा त्या उगवतात. विशेष म्हणजे एका वर्षी वाढलेली ही वनस्पती तलावात पूर्णत: कुजून मातीमोल होते. त्यामुळे तलावाच्या आतील भाग दरवर्षी उथळ होत असते. याचा परिणाम पाणी साठवणुकीवर होत आहे. या तलावातील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. सोबतच पावसाळ्यानंतर विशेषत: जानेवारी महिन्यात फुले येण्याआधी या वनस्पतीची विल्हेवाट लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प