शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अतिरिक्त शिक्षकांची अडचण वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:47 IST

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करताच बदली प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकांचे सर्वप्रथम समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

ठळक मुद्देसमायोजन केलेच नाही : पुन्हा अवघड क्षेत्रात द्यावी लागणार सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करताच बदली प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकांचे सर्वप्रथम समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.आॅनलाईन बदलीची प्रक्रिया राबविण्यापूर्वी पटसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक होते. मात्र समायोजन न करताच बदल्यांची प्रक्रिया राबविली जात आहे. संबंधित शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेने दिला आहे. मात्र त्यांना संबंधित शाळेत १० वर्षांची सेवा झाली नसल्याने त्यांचा अर्ज बदली पोर्टल स्वीकारत नाही. त्यामुळे बदलीसाठी अर्ज करणे शक्य नाही. जिल्हा परिषद आता इतर शिक्षकांच्या बदल्या करून घेईल. त्यानंतर उर्वरित जागांवर या अतिरिक्त शिक्षकांना समुपदेशन करून पाठवले जाणार आहे. काही शिक्षक अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात आल्याला एक ते दोनच वर्ष झाले आहेत. मात्र त्यांची पुन्हा रवानगी भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या दुर्गम भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास त्यांच्यावर फार मोठा अन्याय असेल. त्यामुळे जिल्हा परिषदेने ३० सप्टेंबर २०१८ च्या संचमान्यतेनुसार सर्वप्रथम अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे. त्यानंतरच बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षण