शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

धर्मरावबाबा आत्राम यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

By admin | Updated: June 12, 2014 00:04 IST

मुंबई येथे ७ जून रोजी पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच विद्यमान व माजी आमदार यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

चुरमुरा : मुंबई येथे ७ जून रोजी पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच विद्यमान व माजी आमदार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राकाँचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यशैलीवर ठपका ठेवून त्यांचा अवमान केला. या घटनेचा निषेध करीत धर्मरावबाबा आत्राम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय सरचिटणीस बाबा हाशमी, माजी आमदार हरिराम वरखडे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष जयदेव मानकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष लतीफ शेख, भास्कर बोडणे यांनी केली.पत्रकार परिषदेत माहिती देतांना बाबा हाशमी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फक्त मुंबईला बसून जिल्ह्याचा कारभार पाहत असतात. जिल्हाध्यक्ष झाल्यापासून आजतागायत तालुक्यातील राकाँ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या नाही. पालकमंत्री आल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम बाहेर पडतात. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती कमकुवत होत आहे. याचाच परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. माजी आमदार हरिराम वरखडे, सुरेश पोरेड्डीवार यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत होते. तळागळातील लोकांपर्यंत पक्ष पोहचला होता. मात्र जिल्हाध्यक्षपदी धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती झाल्यापासून पक्ष संघटनेची फार मोठी हानी झालेली आहे. कोणत्याही तालुक्यात महिला व युवकांची समिती गठीत करण्यात आलेली नाही. यामुळे पक्षातील बहुतांश कार्यकर्ते विखुरल्या गेले आहेत, असेही बाबा हाशमी यावेळी म्हणाले.पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा विकासासाठी १९ कोटी व २२ कोटी रूपयाचा निधी दिला. मात्र या निधीतून मर्जीतील कंत्राटदारांना काम दिले. स्वत:च्या मुलीला जि. प. चे अध्यक्ष करण्यासाठी भाजपसोबत युती केली. मुंबईच्या बैठकीबाबत कोणत्याही पदाधिकाऱ्यांना सूचना दिली नाही असा आरोप उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. (वार्ताहर)