शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धर्मरावबाबा आत्राम यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

By admin | Updated: June 12, 2014 00:04 IST

मुंबई येथे ७ जून रोजी पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच विद्यमान व माजी आमदार यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

चुरमुरा : मुंबई येथे ७ जून रोजी पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच विद्यमान व माजी आमदार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राकाँचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यशैलीवर ठपका ठेवून त्यांचा अवमान केला. या घटनेचा निषेध करीत धर्मरावबाबा आत्राम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय सरचिटणीस बाबा हाशमी, माजी आमदार हरिराम वरखडे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष जयदेव मानकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष लतीफ शेख, भास्कर बोडणे यांनी केली.पत्रकार परिषदेत माहिती देतांना बाबा हाशमी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फक्त मुंबईला बसून जिल्ह्याचा कारभार पाहत असतात. जिल्हाध्यक्ष झाल्यापासून आजतागायत तालुक्यातील राकाँ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या नाही. पालकमंत्री आल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम बाहेर पडतात. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती कमकुवत होत आहे. याचाच परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. माजी आमदार हरिराम वरखडे, सुरेश पोरेड्डीवार यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत होते. तळागळातील लोकांपर्यंत पक्ष पोहचला होता. मात्र जिल्हाध्यक्षपदी धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती झाल्यापासून पक्ष संघटनेची फार मोठी हानी झालेली आहे. कोणत्याही तालुक्यात महिला व युवकांची समिती गठीत करण्यात आलेली नाही. यामुळे पक्षातील बहुतांश कार्यकर्ते विखुरल्या गेले आहेत, असेही बाबा हाशमी यावेळी म्हणाले.पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा विकासासाठी १९ कोटी व २२ कोटी रूपयाचा निधी दिला. मात्र या निधीतून मर्जीतील कंत्राटदारांना काम दिले. स्वत:च्या मुलीला जि. प. चे अध्यक्ष करण्यासाठी भाजपसोबत युती केली. मुंबईच्या बैठकीबाबत कोणत्याही पदाधिकाऱ्यांना सूचना दिली नाही असा आरोप उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. (वार्ताहर)