शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच ...

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच वर्षाचा कालावधी उलटून अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे रहदारीस अडथळा येत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

धानाेरा-वैरागड मार्गाचे प्रत्यक्ष काम मे २०१८ सुरू करण्यात आले. खोदकाम केल्यानंतर कालांतराने पावसाळा सुरु झाला. नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या. यातच रस्ताच वाहून गेला. मार्च २०२० पासून करोना संसर्गामुळे सर्व ठप्प पडले. धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम अशाही स्थितीत सोडे ते मोहली पर्यंत जून-जुलै २०२० मध्ये सुरू करण्याकरिता गिट्टी टाकून पसरविण्यात आले. परंतु काम झाले नाही. कठिण परिस्थितीत मोठी कसरत करुत वाहने चालवावी लागत आहेत. सध्या मोहली-रांगी-विहीरगाव या १८ कि.मी.मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी बाहेर निघाली आहे. कंत्राटदारांच्या दुर्लक्षित पणामुळे मागील अडीच वर्षांपासून या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने धानोरा-रांगी-वैरागड-ठाणेगाव या ४० कि.मी.अंतराचे रुंदीकरण व मजबुतीकरिता निविदा काढली. याचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले. धानोराबाजूने काम करण्याकरिता सोडे गावापासून मोहली गावापर्यंत संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. मात्र प्रत्यक्ष २०१९ पर्यंत कामाला सुरूवात करण्यात आली नाही. या मार्गाचे लवकर काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल

धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाने दररोज जड वाहने ये-जा करतात. जड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याची दखल लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे, या मार्गावरील बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठिण झाले आहे. त्यांचे हाल हाेत आहेत. सोबतच रांगी ते आरमोरी मार्गावर पावसामुळे भगदाड पडल्याने हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. उन्हाळ्यात रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा लोकांना हाेती परंतु मागील वर्षी रस्त्याचे काम सुरू झाले नाही. सध्या या मार्गावर गिट्टी पसरवली असल्यामुळे नागरिकांना लोहारा ते रागी मार्गाने ये-जा करणे बंद झाले आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास हाेऊ नये म्हणून प्रशासनाने लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.