शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच ...

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच वर्षाचा कालावधी उलटून अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे रहदारीस अडथळा येत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

धानाेरा-वैरागड मार्गाचे प्रत्यक्ष काम मे २०१८ सुरू करण्यात आले. खोदकाम केल्यानंतर कालांतराने पावसाळा सुरु झाला. नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या. यातच रस्ताच वाहून गेला. मार्च २०२० पासून करोना संसर्गामुळे सर्व ठप्प पडले. धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम अशाही स्थितीत सोडे ते मोहली पर्यंत जून-जुलै २०२० मध्ये सुरू करण्याकरिता गिट्टी टाकून पसरविण्यात आले. परंतु काम झाले नाही. कठिण परिस्थितीत मोठी कसरत करुत वाहने चालवावी लागत आहेत. सध्या मोहली-रांगी-विहीरगाव या १८ कि.मी.मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी बाहेर निघाली आहे. कंत्राटदारांच्या दुर्लक्षित पणामुळे मागील अडीच वर्षांपासून या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने धानोरा-रांगी-वैरागड-ठाणेगाव या ४० कि.मी.अंतराचे रुंदीकरण व मजबुतीकरिता निविदा काढली. याचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले. धानोराबाजूने काम करण्याकरिता सोडे गावापासून मोहली गावापर्यंत संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. मात्र प्रत्यक्ष २०१९ पर्यंत कामाला सुरूवात करण्यात आली नाही. या मार्गाचे लवकर काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल

धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाने दररोज जड वाहने ये-जा करतात. जड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याची दखल लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे, या मार्गावरील बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठिण झाले आहे. त्यांचे हाल हाेत आहेत. सोबतच रांगी ते आरमोरी मार्गावर पावसामुळे भगदाड पडल्याने हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. उन्हाळ्यात रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा लोकांना हाेती परंतु मागील वर्षी रस्त्याचे काम सुरू झाले नाही. सध्या या मार्गावर गिट्टी पसरवली असल्यामुळे नागरिकांना लोहारा ते रागी मार्गाने ये-जा करणे बंद झाले आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास हाेऊ नये म्हणून प्रशासनाने लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.