शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच ...

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच वर्षाचा कालावधी उलटून अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे रहदारीस अडथळा येत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

धानाेरा-वैरागड मार्गाचे प्रत्यक्ष काम मे २०१८ सुरू करण्यात आले. खोदकाम केल्यानंतर कालांतराने पावसाळा सुरु झाला. नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या. यातच रस्ताच वाहून गेला. मार्च २०२० पासून करोना संसर्गामुळे सर्व ठप्प पडले. धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम अशाही स्थितीत सोडे ते मोहली पर्यंत जून-जुलै २०२० मध्ये सुरू करण्याकरिता गिट्टी टाकून पसरविण्यात आले. परंतु काम झाले नाही. कठिण परिस्थितीत मोठी कसरत करुत वाहने चालवावी लागत आहेत. सध्या मोहली-रांगी-विहीरगाव या १८ कि.मी.मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी बाहेर निघाली आहे. कंत्राटदारांच्या दुर्लक्षित पणामुळे मागील अडीच वर्षांपासून या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने धानोरा-रांगी-वैरागड-ठाणेगाव या ४० कि.मी.अंतराचे रुंदीकरण व मजबुतीकरिता निविदा काढली. याचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले. धानोराबाजूने काम करण्याकरिता सोडे गावापासून मोहली गावापर्यंत संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. मात्र प्रत्यक्ष २०१९ पर्यंत कामाला सुरूवात करण्यात आली नाही. या मार्गाचे लवकर काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल

धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाने दररोज जड वाहने ये-जा करतात. जड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याची दखल लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे, या मार्गावरील बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठिण झाले आहे. त्यांचे हाल हाेत आहेत. सोबतच रांगी ते आरमोरी मार्गावर पावसामुळे भगदाड पडल्याने हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. उन्हाळ्यात रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा लोकांना हाेती परंतु मागील वर्षी रस्त्याचे काम सुरू झाले नाही. सध्या या मार्गावर गिट्टी पसरवली असल्यामुळे नागरिकांना लोहारा ते रागी मार्गाने ये-जा करणे बंद झाले आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास हाेऊ नये म्हणून प्रशासनाने लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.