शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

साक्षर होऊन समाजाचा विकास घडवा

By admin | Updated: May 7, 2015 01:16 IST

मंदिरात रांग लावण्यापेक्षा वाचनालयाकडे वळून तळागाळातील माणसाला सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर साक्षरतेचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.

घोट : मंदिरात रांग लावण्यापेक्षा वाचनालयाकडे वळून तळागाळातील माणसाला सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर साक्षरतेचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे साक्षर होऊन स्वत:चा व देशाचा विकास घडविता येऊ शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील पेटतळा येथील संस्कार बालसदन निराधार अनाथ बालकांच्या इमारत बांधकामाकरिता निधीसाठी जिल्हा परिषद शाळेत समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कीर्तनकार सत्यपाल महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपरामजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश उपाध्ये होते. प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, सरपंच बाळा येनगंटीवार, लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष अंनिस परपिल्ली, प्राचार्य विनय चव्हाण, गिरीश उपाध्ये, बोडे, तिडके, उमाजी कुद्रपवार आदी उपस्थित होते.सत्यपाल महाराज म्हणाले की, अंधश्रद्धा, दारूच्या व्यसनामुळे समाजाची अधोगती होत आहे. वाईट गोष्टीकडे पैसा खर्च करण्यापेक्षा घरी शौचालय तयार करा, भ्रष्टाचार समाजातील कीड असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना थोर पुरुषांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचे ग्रामगीतेच्या माध्यमातून आचरण झाले पाहिजे. प्रास्ताविक गिरीजाशंकर उपाध्ये, संचालन विजय कारखेले तर आभार भारती उपाध्ये यांनी मानले. (वार्ताहर)