शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

साक्षर होऊन समाजाचा विकास घडवा

By admin | Updated: May 7, 2015 01:16 IST

मंदिरात रांग लावण्यापेक्षा वाचनालयाकडे वळून तळागाळातील माणसाला सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर साक्षरतेचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.

घोट : मंदिरात रांग लावण्यापेक्षा वाचनालयाकडे वळून तळागाळातील माणसाला सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर साक्षरतेचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे साक्षर होऊन स्वत:चा व देशाचा विकास घडविता येऊ शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील पेटतळा येथील संस्कार बालसदन निराधार अनाथ बालकांच्या इमारत बांधकामाकरिता निधीसाठी जिल्हा परिषद शाळेत समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कीर्तनकार सत्यपाल महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपरामजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश उपाध्ये होते. प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, सरपंच बाळा येनगंटीवार, लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष अंनिस परपिल्ली, प्राचार्य विनय चव्हाण, गिरीश उपाध्ये, बोडे, तिडके, उमाजी कुद्रपवार आदी उपस्थित होते.सत्यपाल महाराज म्हणाले की, अंधश्रद्धा, दारूच्या व्यसनामुळे समाजाची अधोगती होत आहे. वाईट गोष्टीकडे पैसा खर्च करण्यापेक्षा घरी शौचालय तयार करा, भ्रष्टाचार समाजातील कीड असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना थोर पुरुषांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचे ग्रामगीतेच्या माध्यमातून आचरण झाले पाहिजे. प्रास्ताविक गिरीजाशंकर उपाध्ये, संचालन विजय कारखेले तर आभार भारती उपाध्ये यांनी मानले. (वार्ताहर)