शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

मंजूर हाेऊनही ७०० वर विद्यार्थ्यांना वाहतूक भत्त्याचा लाभच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST

गडचिराेली : नजीकच्या क्षेत्रात शाळा उपलब्ध नाही, अशा भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने वाहतूक भत्ता, वाहतूक सुविधा उपलब्ध ...

गडचिराेली : नजीकच्या क्षेत्रात शाळा उपलब्ध नाही, अशा भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने वाहतूक भत्ता, वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान दिले जाते. प्रतिमाह ३०० रुपयांप्रमाणे प्रवासभत्ता मंजूर हाेऊनही शासनाकडून ते अनुदान न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील ७०० वर विद्यार्थी वाहतूक भत्त्यापासून वंचित आहेत.

विशेष म्हणजे गतवर्षीचे ४२०पेक्षा अधिक व यावर्षीच्या २६८ विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आला हाेता. विद्यार्थ्यांना या याेजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अनुदान स्वरूपात निधी उपलब्ध हाेईल, अशी अपेक्षा शिक्षण विभागाची हाेती. मात्र, शासनाकडून अनुदानाचा एकही रुपया प्राप्त झाला नाही. काेराेनामुळे यावर्षी सदर याेजनेकरिता निधी उपलब्ध नसून अनुदान मिळणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे शिक्षण विभागाला देण्यात आली.

स्वत:च्या गावापासून शाळेपर्यंत सायकलने किंवा पायी, तसेच खासगी वाहनाने दरराेज ये-जा करणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ३०० रुपये अनुदान देण्याची शासनाची ही याेजना आहे. गतवर्षी ४२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला. मात्र, शासनाकडून अनुदानच प्राप्त न झाल्याने पात्र विद्यार्थी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

यावर्षी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात जिल्हाभरातील एकूण ४२३ लाभार्थी या याेजनेसाठी निश्चित झाले हाेते. काेराेनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पूर्णत: बंद आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या एकूण २६८ विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला. एकूण ४२३ विद्यार्थी आपल्या गावापासून ते शाळेच्या गावापर्यंत ये-जा करणारे आहेत. यापैकी २६८ विद्यार्थी या भत्त्यासाठी पात्र झाले. मात्र, शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने त्यांना लाभ मिळाला नाही.

दाेन वर्षांतील मिळून गडचिराेली जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक भत्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बाॅक्स

पालकांमध्ये नाराजी

स्वत:च्या गावात शाळा नाही. महामंडळाची माेफत एसटी बस सुविधा नाही. अशा स्थितीत अनेक गावांतील विद्यार्थ्यांना सायकलने किंवा पायी शाळा असलेल्या गावात दरराेज जावे लागते. काही विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करून शाळेत हजेरी लावतात. अप-डाऊन करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांची शाळेतील पटावरील उपस्थिती टिकून राहावी, यासाठी शासनाने वाहतूक भत्ता देण्याची याेजना अमलात आणली. मात्र, यंदा शासनाने विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी निधी न दिल्याने बऱ्याच पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.