शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देसाईगंज व कोरची पं.स. राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 5:00 AM

केंद्र शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास आराखडा व बालकल्याण पुरस्कारासाठी जानेवारी २०२० मध्ये प्रस्ताव मागविले होते. याकरिता २०१८-१९ हे आर्थिक वर्ष मूल्यांकनासाठी निवडण्यात आले होते. राज्यातील प्रत्येक पंचायत समितीने या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणे गरजेचे होते.

ठळक मुद्देकेंद्राकडून घोषणा : पंडित दीनदयालय उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कारास पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/कोरची : पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारने केली असून त्यात नॉनपेसा गटातून देसाईगंज तर पेसा गटातून कोरची पंचायत समिती राज्यात अव्वल ठरल्या आहेत.केंद्र शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास आराखडा व बालकल्याण पुरस्कारासाठी जानेवारी २०२० मध्ये प्रस्ताव मागविले होते. याकरिता २०१८-१९ हे आर्थिक वर्ष मूल्यांकनासाठी निवडण्यात आले होते. राज्यातील प्रत्येक पंचायत समितीने या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणे गरजेचे होते. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरून मूल्यांकन करून सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवायचे होते. यात पेसाविरहित (नॉनपेसा) गटातून देसाईगंज पंचायत समिती तर पेसा गटातून कोरची पंचायत समिती राज्यात अव्वल आल्याची घोषणा केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने १६ जून रोजी केली.प्रथम जिल्हास्तरावर या पुरस्कार प्रस्तावाचे मूल्यांकन करून प्रथमस्थानी आलेल्यांचे प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर राज्याकडे व राज्याकडून केंद्राकडे असे टप्पे देण्यात आले होते. हे सर्व टप्पे पार करीत कोविड-१९ च्या प्रादुर्भावापूर्वी राज्य शासनाने विभागीय पुरस्कारासाठी मुंबई येथे रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला होता. आता राज्यस्तरावर कोरची व देसाईगंज पंचायत समिती अव्वल आल्याने त्या पुरस्कारांचे वितरण दिल्ली येथे होणार आहे, अशी माहिती देसाईगंज पं.स.चे गटविकास अधिकारी श्रावण सलाम यांनी दिली.सदर पुरस्कारासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, देसाईगंज पं.स.सभापती रेवता अलोणे, माजी सभापती मोहन गायकवाड यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी, सरपंच, कर्मचारी व ग्रामसेवकांचे योगदान असल्याची प्रतिक्रिया गटविकास अधिकारी सलाम यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकाचवेळी दोन पंचायत समित्यांना राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढणार आहे.नऊ विषयाच्या निकषांवर झाले मूल्यांकनसदर पुरस्कारासाठी केंद्र सरकारने एकूण १०० गुणांची प्रश्नावली निश्चित केली होती. यामध्ये स्वच्छता, नागरी सुविधा (पिण्याचे पाणी, पथदिवे, पायाभूत सुविधा), नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, दुर्लक्षित घटक, सामाजिक क्षेत्रातील कामगिरी, आपत्ती व्यवस्थापन, उत्पन्न वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, ग्रा.पं.च्या विकासासाठी स्वेच्छेने काम करणाºया व्यक्ती, संस्था व ई-गव्हर्नन्स असे एकूण नऊ विषय सदर पुरस्कार स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते.पंचायत समितीअंतर्गत सर्व योजना, तसेच केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत विविध विभागांच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात पंचायत समितीला यश आले. त्यामुळे गुणांकानुसार हा पुरस्कार प्राप्त झाला. सीईओ डॉ.विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा हा पुरस्कार आहे.- देवीदास देवरे,गटविकास अधिकारी, कोरची

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती