शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बदल्यापूर्वीच शिक्षकांच्या शहरी शाळेत प्रतिनियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या ३१ मे पर्यंत करण्याबाबतचा शासन निर्णय ७ एप्रिल राेजी निर्गमित ...

गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या ३१ मे पर्यंत करण्याबाबतचा शासन निर्णय ७ एप्रिल राेजी निर्गमित करण्यात आला. त्यामुळे मागील दाेन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सन २०२०-२१ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ४० पेक्षा अधिक शिक्षकांनी प्रतिनियुक्त बदल्यांचे आदेश प्राप्त करून घेतले. विशेष म्हणजे हे शिक्षक शहरी भागातील शाळांमध्ये रुजू झाले आहेत.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक बदली प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षी शिक्षकांची बदली प्रक्रिया काेराेना प्रादुर्भावामुळे रद्द झाली. प्रशासनाला ही प्रक्रिया घेता आली नाही. आता ७ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार मे महिन्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यापूर्वीच शहरी भागातील शाळांमध्ये बऱ्याच शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रतिनियुक्त्या मिळवून घेतल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

सन २०१७-१८ यावर्षी जिल्ह्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या माेठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून दुर्गम व अवघड क्षेत्रात नाेकरी करणाऱ्या शिक्षकांना इच्छीतस्थळी बदल्या मिळाल्या. त्याचवेळी शहरी भागात मागील २० वर्षांपासून दडून बसलेल्या शिक्षकांच्या दुर्गम भागात बदल्या करण्यात आल्या. त्याच शिक्षकांनी पुन्हा शिक्षण विभागाशी संधान साधून वेगवेगळे आजार व इतर कारणे दाखवून विभागीय आयुक्तांकडे बदलीचा प्रस्ताव सादर केला. प्रतिनियुक्ती बदलीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षण विभागासह विभागीय आयुक्त कार्यालयात जाेरदार पाठपुरावा केला. दरम्यान या शिक्षकांनी गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, देसाईगंज या शहरी भागातील पंचायत समितीमधील सुगम शाळांमध्ये बदल्या करून घेतल्या.

प्रतिनियुक्ती बदली केलेल्या शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक हे दाेन वर्षांपूर्वीच शहरी भागातील शाळेतून बदली हाेऊन दुर्गम भागात गेले हाेते. आता ऑनलाइन बदल्यापूर्वीच या शिक्षकांनी प्रतिनियुक्ती बदल्याद्वारे जुन्याच पंचायत समितीमध्ये दाखल झाले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून दुर्गम व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय झाला असून काेराेनाकाळात करण्यात आलेल्या या प्रतिनियुक्ती बदल्यांमुळे प्रशासनाविरुद्ध दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बाॅक्स...

प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी

काेणत्याही शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेची तीन वर्ष आस्थापनेच्या ठिकाणी पूर्ण करणे गरजेचे आहे. साधारणत: तीन ते साडेतीन वर्ष पूर्ण झाल्यावर प्रशासनाच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या शासन नियमानुसार बदली केली जाते. मात्र शहरी भागातील शिक्षक दुर्गम भागातील शाळांमध्ये दीड ते दाेन वर्षांपेक्षा अधिक दिवस सेवा देत नाही. प्रतिनियुक्ती बदली करून साेयीस्कर शाळा मिळवून घेतात. परिणामी दुर्गम व अवघड भागातील शिक्षकांना सुगम तसेच शहरी भागातील शाळांमध्ये सेवा देण्याची संधी प्राप्त हाेत नाही. ऑनलाइन बदल्यापूर्वी विभागीयस्तरावरून झालेल्या शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या बदल्या रद्द करण्यात याव्या, अशी मागणी दुर्गम भागातील शिक्षकांनी केली आहे.